शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022: “काँग्रेससह सप-बसपला मतदान करणे म्हणजे पाप, त्यांना मंदिरा जायलाही भीती वाटते”: भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 14:56 IST

UP Election 2022: अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्ता राखण्यात यशस्वी होतील, असे सांगितले गेले.

ठळक मुद्देकाँग्रेस, सप, बसप यांना मतदान करणे म्हणजे पापही लोकं मंदिरात जायला घाबरतात, भारत माता की जय म्हणायला घाबरतातभाजपचे टीकास्त्र

लखनऊ:उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर, अनेकविध पक्षांनी भाजपला पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्ता राखण्यात यशस्वी होतील, असे सांगितले गेले. आहे. यातच आता काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांना मतदान करणे पाप असून, त्यांना मंदिरात जायलाही भीती वाटते, असा टोला भाजपने लगावला आहे. (up bjp chief swatantra dev singh said voting for sp bsp congress sin)

“मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप

उत्तर प्रदेशमधील भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेस, सप, बसपवर जोरदार टीका केली आहे. स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेससह सप-बसपला मतदान करणे म्हणजे पाप असल्याचे म्हटले आहे. यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. एका महिला कार्यसमितीला संबोधित करताना स्वतंत्र देव सिंह यांनी सदर विधान केल्याचे सांगितले जात आहे. 

“मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालतंय”; काँग्रेसचा घणाघात

भारत माता की जय बोलायला घाबरतात

काँग्रेस, सप, बसप यांना मतदान करणे म्हणजे पाप आहे. ही लोकं मंदिरात जायला घाबरतात, भारत माता की जय म्हणायला घाबरतात, असे सांगत शेतकऱ्यांच्या पाठीवर बंदूक ठेवून विरोधी पक्ष आक्रमणकारी झाला आहे, असा आरोप स्वतंत्र देव सिंह यांनी केला आहे. दरम्यान, स्वतंत्र देव सिंह यांनी अलीकडेच सप नेते मुलायम सिंह यादव यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी मुलायम सिंह यादव यांनी स्वतंत्र देव सिंह यांना समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती मात्र, ती केवळ राजकीय चर्चाच ठरल्याचे सांगितले जात आहे.

“जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं”; भाजपचा पलटवार

दरम्यान, पुढील वर्षाच्या सुरुवातीला देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. कारण यात एका अशा राज्याचाही समावेश आहे जेथे देशातील सर्वाधिक ८० लोकसभा जागा आहेत. भाजपला २०२४ मध्ये पुन्हा केंद्रात सत्तेवर विराजमान व्हायचे असेल, तर तर त्यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा उंचावणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला २५९ ते २६७ जागा मिळू शकतात. तर समाजवादी पक्षाला १०९ ते ११७ जागा, बसपला १२ ते १६ जागा, काँग्रेसला ३ ते ७ जागा आणि इतरांना ६ ते १० जागा मिळू शकतात, असा दावा एबीपी न्यूज सी व्होटर सर्वेक्षणात करण्यात आला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी