शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

चिडी मारण्याची बंदुकी दिली, वाघ मारण्याची अपेक्षा कशी करता? गुलाबराव पाटील यांची फटकेबाजी : गिरीश महाजनांच्या आड येणार्‍यांचा सत्यानाश होईल

By admin | Updated: October 16, 2016 21:27 IST

जळगाव : सहकार खात्याचा मंत्री असलो तरी माझ्याकडे फार काही देण्यासारखे नाही. सकाळी उठल्याबरोबर ठेवीदार दारात उभे राहतात. कर्जाचे पुनर्गठनासाठीच्या निधीबाबत विचारणा होते. माझ्या हातात चिडी मारण्याची बंदुक दिली मात्र जनता माझ्याकडून वाघ मारण्याची अपेक्षा करीत असल्याचे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आड येणार्‍यांचा सत्यानाश व्हावा असा नारा देखील त्यांनी आपल्या भाषणात दिला.

जळगाव : सहकार खात्याचा मंत्री असलो तरी माझ्याकडे फार काही देण्यासारखे नाही. सकाळी उठल्याबरोबर ठेवीदार दारात उभे राहतात. कर्जाचे पुनर्गठनासाठीच्या निधीबाबत विचारणा होते. माझ्या हातात चिडी मारण्याची बंदुक दिली मात्र जनता माझ्याकडून वाघ मारण्याची अपेक्षा करीत असल्याचे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आड येणार्‍यांचा सत्यानाश व्हावा असा नारा देखील त्यांनी आपल्या भाषणात दिला.
जामनेर येथील सभेच्या ठिकाणी गुलाबराव पाटील यांचे आगमन झाल्याबरोबर प्रेक्षकांमधून गुलाबरावांनी भाषण करावे अशी मागणी येऊ लागली. भाषणासाठी गुलाबराव माईकजवळ आल्यानंतर प्रेक्षकांनी एकच घोषणाबाजी सुरु केली.

गिरीश महाजन यांनी जिल्‘ाचा विकास करावा
टपरीवाला आमदार म्हणून गिरीश महाजन व आपली सारखीच ओळख. कार्यकर्त्यांना प्रेम देणारा माणूस म्हणजे गिरीश भाऊ आहे. त्यांनी जामनेर तालुक्याचा विकास करून इतिहास घडविला आहे. मात्र त्यांनी आता केवळ जामनेरचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्याचा विकास करावा असे आवाहन केले.

१०० कोटी दिल्यास आमचे नंदनवन होईल
जलसंपदा मंत्र्यांनी वाघूर धरणाला पैसे दिले. निम्न तापी व शेळगाव बॅरेजच्या कामाला देखील गती दिली आहे. जामनेरसह जळगाव ग्रामीणला संजीवनी देणार्‍या भागपूर प्रकल्पासाठी १०० कोटीच्या निधीची तरतूद केल्यास आमच्या भागात देखील नंदनवन येईल अशी अपेक्षा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
तुमच्या लग्नात माझा साखरपुडा
जामनेरमध्ये विकासकामांचा धडाका सुरु असल्याने तुमचे लग्न सुरु आहे. जादा निधी मिळवित तुमच्या लग्नात आमचा साखरपुडा करून घ्यावा असा विचार सुरू आहे. मतदारसंघाला निधी मिळावा यासाठी परमार्थाबरोबर थोडा स्वार्थ साधत असल्याचे गुलाबरावम्हणाले.
सकाळी उठलो की ठेवीदारांची भेट होते
सकाळी झोपेतून उठलो की पहिली भेट ही ठेवीदारांची होते. जिल्ह्यातील ठेवीदारांची ४१७ कोटी रुपयांची देणी आहेत. ठेवीदार व शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी मदत मिळावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. असे झाल्यास गिरीशभाऊच्या विकासाच्या इंजिनला गुलाबरावचा डब्बा जोडला जाईल असे सांगताच सभास्थळी हास्यकल्लोळउडाला.
...त्यांचा सत्यानाश होवो
गिरीशभाऊ हे पैशांनी श्रीमंत नाहीत मात्र माणसे जोडणारा आणि मनाने मोठा असलेला माणूस आहे. त्यांच्या आड जो कुणी येईल त्याचा सत्यानाश होईल असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी महाजन विरोधकांना लगावला.