शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, खासदारांना परत बोलाविण्यासाठी विधेयक

By admin | Updated: March 1, 2017 04:40 IST

खासदाराची कामगिरी समाधानकारक नसेल, परत बोलाविण्याचा अधिकार मतदारांना देणारा कायदा करण्यासाठी एक खासगी विधेयक भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी लोकसभेत मांडले

नवी दिल्ली : निवडणुकीत निवडून दिलेल्या आमदार वा खासदाराची कामगिरी समाधानकारक नसेल, तो आपले कर्तव्य पार पाडत नसेल किंवा त्याने काही दुष्कृत्ये केली असतील तर त्याला परत बोलाविण्याचा अधिकार मतदारांना देणारा कायदा करण्यासाठी एक खासगी विधेयक भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी लोकसभेत मांडले आहे.लोकशाही अधिक लोकाभिमुख होण्यासाठी असा कायदा करण्याची मागणी अनेकांनी फार पूर्वीपासून केली आहे. मात्र लोकप्रतिनिधित्व कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही. कायदा दुरुस्ती करून तशी तरतूद करण्यासाठी वरुण गांधींचे हे विधेयक आहे. मात्र यासाठी घेतल्या जाणाऱ्या मतदानात संबंधित मतदारसंघातील किमान ७५ टक्के मतदारांनी निवडलेला लोकप्रतिनिधी परत बोलावण्याच्या बाजूने मत दिले तरच त्या लोकप्रतिनिधीला पदावरून हटविता येईल, असे या विधेयकात प्रस्तावित करण्यात आले आहे.या विधेयकामगी भूमिका स्पष्ट करताना वरुण गांधी म्हणाले की, जगातील अनेक लोकशाही देशांमध्ये अशा प्रकारचा प्रयोग करून पाहिला गेला आहे. लोकांना आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असेल तर निवडून दिलेल्या प्रतिनिधीला पायउतार करण्याचा अधिकारही त्यांना असायला हवा हे तर्काला धरून व न्यायाचे आहे.अशा प्रकारची अनेक खासगी विधेयके संसदेत शुक्रवारी त्यासाठी राखून ठेवलेल्या खास वेळेत सदस्यांकडून मांडली जातात. ती कधी मंजूर होत नाहीत. विषय खूपच गंभीर व तात्कालिक दखल घेण्यासारखा असेल तर सरकार त्यासाठी स्वत: विधेयक आणण्याचे आश्वासन देते व खासगी विधेयक बहुधा मागे घेतले जाते. परंतु या निमित्ताने संबंधित विषय चर्चेत येतो, हे मात्र नक्की. (लोकमत न्यूज नेटवर्क)>प्रतिनिधी माघारीची प्रक्रियाखासदार वरुण गांधी यांच्या या विधेयकात निर्वाचित लोकप्रतिनिधी माघारी बोलाविण्याची जी प्रक्रिया सुचविली आहे, ती थोडक्यात अशी :प्रतिनिधी माघारी बोलाविण्यासाठी संबंधित मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी किमान २५ टक्के मतदारांच्या स्वाक्षऱ्यांचा अर्ज लोकसभा किंवा विधानसभा अध्यक्षांकडे करायचा.अध़्यक्षांनी आपल्या पातळीवर शहानिशा करून तो निवडणूक आयोगाकडे पाठवायचा.निवडणूक आयोगाने मतदारांच्या स्वाक्षऱ्या पडताळून पाहून अर्जाच्या सत्यतेची पडताळणी करायची.अर्ज ठाकठिक असेल तर त्यावर आयोगाने मतदारसंघात किमान १० ठिकाणी मतदान आयोदित करायचे.या मतदानात मतदारसंघातील किमान ७५ टक्के लोकांनी माघारीच्या बाजूने कौल दिला तर प्रतिनिधी त्यांना पसंत नाही, असे मानले जाईल.निवडणूक आयोगाने अशा रिकाम्या झालेल्या जागेसाठी नव्याने निवडणूक घ्यायची.आयोगाने या मतदानाचा निकाल जाहीर केल्यावर अध्यक्षांनी संबंधित प्रतिनिधीची सबागृहातील जागा रिकामी झालयचे जाहीर करायचे. >राजकारण्यांना उत्तरदायी ठरविण्याच्या पायावरच खरी पारदर्शी लोकशाही उभी राहू शकेल.- वरुण गांधी, लोकसभा सदस्य, भाजपा