पाटणा - बिहारच्या राजकारणात भाजपचा एक नवा प्रवास सुरू होत आहे. भाजपा विधिमंडळ दलाचे नेते म्हणून निवड झाल्यावर, सम्राट चौधरी बिहारचे पहिले भाजपा मुख्यमंत्री बनत आहेत.
हिंदी पट्ट्यातील महत्त्वाचे राज्य असूनही आजवर भाजपला बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद मिळवता आले नव्हते, हा दुष्काळ आता संपला आहे. संघाची पार्श्वभूमी नसतानाही केवळ आपल्या वक्तृत्वशैलीच्या आणि संघटन कौशल्याच्या जोरावर सम्राट चौधरी यांनी भाजपात आपले स्थान निर्माण केले आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या 'इनिंग'कडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.
राजकीय प्रवाससम्राट चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात लालू प्रसाद यादव यांच्या राजद (राष्ट्रीय जनता दल) पक्षातून केली. राबडी देवी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते. २०१४ मध्ये ते राजद सोडून नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये सामील झाले. आणि २०१७ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. अवघ्या नऊ वर्षांत त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे.
२०२२ मध्ये जेव्हा नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली होती, तेव्हा सम्राट चौधरी यांनी डोक्यावर पगडी बांधून एक शपथ घेतली होती की. 'नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतरच मी ही पगडी उतरवीन.’
सम्राट चौधरींपुढील आव्हाने युतीचे संतुलन : नितीश कुमार यांच्या जदयू आणि इतर लहान मित्रपक्षांना सोबत घेऊन जाणे.राजकीय पाया विस्तारणे : भाजपला स्वतःच्या हिमतीवर भक्कम करणे.विरोधकांचे आरोप : राजद व काँग्रेसचे मोठे राजकीय आव्हान त्यांच्यापुढे आहे. वाढती गुंडगिरी हा प्रश्न आहे.शाह यांचा शब्द खरा ठरला!गेल्या वर्षी नोव्हेंबरमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत म्हटले होते की, 'सम्राट चौधरी यांना 'बडा आदमी' बनवले जाईल.' आज मुख्यमंत्री पदाच्या घोषणेसह अमित शाह यांनी दिलेला हा शब्द सत्यात उतरला आहे.
Web Summary : Samrat Choudhary becomes Bihar's first BJP Chief Minister, rising through ranks in nine years. Leaving RJD for JDU, then BJP, he pledged to remove Nitish Kumar. Challenges include balancing alliances and countering opposition amid promises fulfilled by Amit Shah.
Web Summary : सम्राट चौधरी बिहार के पहले भाजपा मुख्यमंत्री बने, नौ वर्षों में रैंकों के माध्यम से ऊपर उठे। राजद छोड़कर जदयू, फिर भाजपा में शामिल हुए, उन्होंने नीतीश कुमार को हटाने का संकल्प लिया। चुनौतियों में अमित शाह द्वारा किए गए वादों के बीच गठबंधन को संतुलित करना और विपक्ष का मुकाबला करना शामिल है।