शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Bihar Politics: भाजपपासून 'फारकत' घेतल्यानंतर, नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 4:11 PM

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर जेडीयू संपवण्यासाठी कट रचण्याचा आरोप केला आहे....

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षासोबतची (BJP) युती तुटल्यानंतर, जनता दल (यू)चे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर जेडीयू संपवण्याचा कट रचण्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर भाजपने नेहमीच अपमानित केले, असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. ते जेडीयू आमदारांच्या बैठकीत बोलत होते.

बैठकीत नितीश कुमार म्हणाले, भाजपने नेहमीच अपमानित केले. जेडीयू संपवण्याचा कट रचण्यात आला. एवढेच नाही, तर भाजपने आपले आमदार खरेदी करण्याचीही तयारी केली होती, असेही धक्कादायक विधान नितीश कुमार यांनी केले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत अनेक आमदार CM नितीश कुमार यांच्यासोबत बोलताना म्हणाले, की सध्याची युती 2020 पासूनच आपल्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. चिराग पासवान यांचे नाव न घेता ते म्हणाले, की ते एक असेच उदाहरण होते. तसेच, जर आता ते सावध झाले नाही, तर हे पक्षाच्या  दृष्टीने योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले.

गेल्या काही काळापासून भाजप आणि नितीश कुमार यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद सुरू होते. नितीश कुमार भाजपची साथ सोडणार अशी चर्चा होती, ती चर्चा आज अखेर खरी ठरली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. आता सीएम नितीश कुमार आरजेडी, डावे आणि काँग्रेस या महाआघाडीसोबत सरकार स्थापन करणार आहेत.

बिहारमध्ये 'ऑपरेशन रिव्हर्स लोटस'भाजप आणि जदयुची युती तुटल्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विटरवरुन भाजपवर निशाणा साधला. बिहारमध्ये सध्या ऑपरेशन रिव्हर्स लोटस सुरू आहे,अशी टीका त्यांनी केली. याशिवाय, लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्या यांनीदेखील, 'राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं लालटेनधारी', अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहार