शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंसारखा धक्का बसण्यापासून नितीश कुमार कसे वाचले?; वाचा बिहारमधील Inside Story 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 15:51 IST

भाजपाचे नेते आरसीपी सिंहमध्ये नवीन 'एकनाथ शिंदे' शोधत असल्याचा आरोप जेडीयू नेत्यांनी केला आहे.

पटना - बिहारच्या राजकारणात महाराष्ट्रासारखी पटकथा लिहिली जात होती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच पक्षातील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. बिहारमध्येही आरसीपी सिंह यांच्या निमित्ताने शिंदे मॉडेलची राजकीय पुनरावृत्ती सुरू होती. परंतु याची वेळीच भनक ओळखून नितीश कुमारांनी अशी तयारी केली ज्यामुळे जेडीयूची अवस्था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखी झाली नाही. 

नितीश कुमार यांनी एकीकडे भाजपाच्या नेतृत्वाचा भरवसा कायम ठेवला तर दुसरीकडे आरजेडीसोबत मिळून सरकार बनवण्याची रणनीती आखत राहिले. नितीश कुमारांनी आरसीपी सिंह यांची हालचाल पाहून त्यांचे अधिकार छाटण्याचे काम सुरू केले. त्यानंतर भाजपाला मात देण्यासाठी प्लॅनिंग रचली. त्यामुळे चिराग पासवान आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखी अवस्था नितीश कुमारांची होण्यापासून वाचली. 

लालू प्रसाद यादव यांच्या कथित जंगलराजच्या दहशतीत विकासाचं राजकारण करणारं नेतृत्व म्हणून नितीश कुमार संघर्षातून राजकारणात आले आहेत. भाजपासोबत नितीश कुमार सरकार चालवत होते. परंतु भाजपाच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष होते. कारण २०२० पासून बिहार भाजपा नेत्यांच्या मनात सर्वाधिक जागा मिळूनही नितीश कुमारांच्या हाताखाली काम करणं खुपसतं होते. दबावामुळे नितीश कुमारांच्या नेतृत्वात सरकार चालवावी लागत होती. 

आता राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री असावा अशी स्थानिक नेत्यांची इच्छा होती. परंतु केंद्रीय नेत्यांच्या दबावापुढे सगळे शांत होते. मात्र भाजपात नाराजी पसरत चालली होती. जेडीयू-भाजपा नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगत होते. याचवेळी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे बंड पुढे आले. तेव्हा शिवसेनेप्रमाणे जेडीयूत फोडाफोडी करण्यात यश आले तर बिहारमध्ये बाजी पलटू शकते असं भाजपा नेत्यांना वाटत होते. 

भाजपाचे नेते आरसीपी सिंहमध्ये नवीन 'एकनाथ शिंदे' शोधत असल्याचा आरोप जेडीयू नेत्यांनी केला आहे. बिहारमध्ये आरसीपी सिंह यांच्या बहाण्याने जेडीयूमध्ये फोडाफोडी करण्याच्या तयारीत होते, पण नितीश कुमार अतिशय काटेकोरपणे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. आरसीपी सिंह यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक नितीश यांना ठाऊक होती. जेडीयू अध्यक्ष ललन सिंह यांनी आरसीपीवर निशाणा साधताना 'नितीश कुमारांनी आंधळा विश्वास ठेवला, पण तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला' असे म्हटले आहे. भाजपचे एजंट बनून जेडीयूमध्ये काम केले असा आरोप केला. 

आरसीपी सिंह यांना कमकुवत केलेबिहारमधील जेडीयूचे राजकीय भवितव्य महाराष्ट्रातील शिवसेनेसारखे होऊ नये यासाठी नितीशकुमार यांनी आधीच सर्व तयारी केली होती. जेडीयूने आरसीपी सिंह यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवले नाही त्यामुळे त्यांना केंद्राच्या मंत्रिपदावरूनही पायउतार व्हावं लागले. यानंतर, आरसीपीला कमकुवत करत, त्यांच्याकडून सर्व महत्त्वाची पदे हिसकावून घेतली आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांना संपवण्यात आले. यातूनच नितीश कुमारांनी पार्टी वाचवली आणि उद्धव ठाकरेंची अवस्था त्यांची झाली नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाShiv Senaशिवसेना