शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

उद्धव ठाकरेंसारखा धक्का बसण्यापासून नितीश कुमार कसे वाचले?; वाचा बिहारमधील Inside Story 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 15:51 IST

भाजपाचे नेते आरसीपी सिंहमध्ये नवीन 'एकनाथ शिंदे' शोधत असल्याचा आरोप जेडीयू नेत्यांनी केला आहे.

पटना - बिहारच्या राजकारणात महाराष्ट्रासारखी पटकथा लिहिली जात होती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच पक्षातील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. बिहारमध्येही आरसीपी सिंह यांच्या निमित्ताने शिंदे मॉडेलची राजकीय पुनरावृत्ती सुरू होती. परंतु याची वेळीच भनक ओळखून नितीश कुमारांनी अशी तयारी केली ज्यामुळे जेडीयूची अवस्था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखी झाली नाही. 

नितीश कुमार यांनी एकीकडे भाजपाच्या नेतृत्वाचा भरवसा कायम ठेवला तर दुसरीकडे आरजेडीसोबत मिळून सरकार बनवण्याची रणनीती आखत राहिले. नितीश कुमारांनी आरसीपी सिंह यांची हालचाल पाहून त्यांचे अधिकार छाटण्याचे काम सुरू केले. त्यानंतर भाजपाला मात देण्यासाठी प्लॅनिंग रचली. त्यामुळे चिराग पासवान आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखी अवस्था नितीश कुमारांची होण्यापासून वाचली. 

लालू प्रसाद यादव यांच्या कथित जंगलराजच्या दहशतीत विकासाचं राजकारण करणारं नेतृत्व म्हणून नितीश कुमार संघर्षातून राजकारणात आले आहेत. भाजपासोबत नितीश कुमार सरकार चालवत होते. परंतु भाजपाच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष होते. कारण २०२० पासून बिहार भाजपा नेत्यांच्या मनात सर्वाधिक जागा मिळूनही नितीश कुमारांच्या हाताखाली काम करणं खुपसतं होते. दबावामुळे नितीश कुमारांच्या नेतृत्वात सरकार चालवावी लागत होती. 

आता राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री असावा अशी स्थानिक नेत्यांची इच्छा होती. परंतु केंद्रीय नेत्यांच्या दबावापुढे सगळे शांत होते. मात्र भाजपात नाराजी पसरत चालली होती. जेडीयू-भाजपा नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगत होते. याचवेळी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे बंड पुढे आले. तेव्हा शिवसेनेप्रमाणे जेडीयूत फोडाफोडी करण्यात यश आले तर बिहारमध्ये बाजी पलटू शकते असं भाजपा नेत्यांना वाटत होते. 

भाजपाचे नेते आरसीपी सिंहमध्ये नवीन 'एकनाथ शिंदे' शोधत असल्याचा आरोप जेडीयू नेत्यांनी केला आहे. बिहारमध्ये आरसीपी सिंह यांच्या बहाण्याने जेडीयूमध्ये फोडाफोडी करण्याच्या तयारीत होते, पण नितीश कुमार अतिशय काटेकोरपणे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. आरसीपी सिंह यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक नितीश यांना ठाऊक होती. जेडीयू अध्यक्ष ललन सिंह यांनी आरसीपीवर निशाणा साधताना 'नितीश कुमारांनी आंधळा विश्वास ठेवला, पण तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला' असे म्हटले आहे. भाजपचे एजंट बनून जेडीयूमध्ये काम केले असा आरोप केला. 

आरसीपी सिंह यांना कमकुवत केलेबिहारमधील जेडीयूचे राजकीय भवितव्य महाराष्ट्रातील शिवसेनेसारखे होऊ नये यासाठी नितीशकुमार यांनी आधीच सर्व तयारी केली होती. जेडीयूने आरसीपी सिंह यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवले नाही त्यामुळे त्यांना केंद्राच्या मंत्रिपदावरूनही पायउतार व्हावं लागले. यानंतर, आरसीपीला कमकुवत करत, त्यांच्याकडून सर्व महत्त्वाची पदे हिसकावून घेतली आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांना संपवण्यात आले. यातूनच नितीश कुमारांनी पार्टी वाचवली आणि उद्धव ठाकरेंची अवस्था त्यांची झाली नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाShiv Senaशिवसेना