शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जिद्दीला सॅल्यूट! 70 वर्षांच्या शेतकऱ्यानं डोंगर कापून बनवला 5 किमी लांबीचा कालवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 2:24 PM

आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे.

बिहारमधील माऊंटन मॅन दशरथ मांझी यांचे नाव प्रसिद्ध आहे. ज्यांनी 22 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एक हातोडा आणि छिन्नीसह 360 फूट लांब,  30 फूट रुंद आणि 25 फूट उंच डोंगर कापून रस्ता बनवला. अशाच एका 70 वर्षीय लौंगी भुईया यांनी खेड्यातील शेकडो लोकांच्या अडचणीवर आपल्या कष्टाने मात केली. 30 वर्षांच्या मेहनतीने डोंगर कापून पाच किलोमीटर लांबीचा कालवा बनविला. आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे.बिहार, गया येथील रहिवासी लौंगी भुईया यांनी कठोर परिश्रम घेऊन एक अनोखं उदाहरण समोर ठेवले आहे, जे कायम लक्षात ठेवले जाईल. 30 वर्ष कष्ट करून त्याने डोंगरावरून पडणा-या पावसाचे पाणी गोळा करून ते गावात आणलं. तो दररोज घरातून निघून थेट जंगलावर जात होता आणि एकट्यानं त्यांनी कालवा बांधण्यास सुरुवात केली. कोठीलवा गावचा रहिवासी असलेला लौंगी भुईया आपला मुलगा, सून आणि पत्नीसमवेत राहतो. भुईयांनी सांगितले की, पहिल्यांदा कुटुंबातील लोकांनी त्याला खूप विरोध केला. पण त्याने ऐकले नाही व कालवा खोदण्याचं काम सुरूच ठेवलं.वास्तविक या भागात पाण्याअभावी लोक केवळ मका आणि हरभरा पिकवत असत. अशा परिस्थितीत गावातील सर्व तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात खेड्यातून शहरात जात होते. कामाच्या शोधात बरेच लोक खेड्यापासून दूर गेले. त्याच वेळी त्यांच्या मनात असा विचार आला की, इथे पाण्याची व्यवस्था असेल तर लोकांचे स्थलांतर रोखता येईल. कठोर परिश्रमानंतर आज कालवा तयार झाला असून, या भागातील तीन गावांतील तीन हजार लोकांना याचा फायदा होत आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जेव्हा केव्हा आम्ही पाहिलं, तेव्हा ते घरात कमी आणि जंगलात जास्त दिसले. त्याचबरोबर लौंगी भुईया यांचे म्हणणे आहे की, जर सरकार काही मदत देऊ शकली तर शेतीसाठी ट्रॅक्टरसारख्या सुविधा मिळू शकतील. शेतीसाठी नापीक जमीन सुपीक बनवू शकेल, ज्यामुळे लोकांना खूप मदत होईल. त्याच वेळी लौंगी भुईया यांच्या कार्यामुळे प्रत्येक जण प्रभावित झाला आहे. आज त्यांचे नाव देशाच्या कानाकोप-यात घेतले जात आहे. प्रत्येक जण त्यांना अभिवादन करीत आहे. ज्यांनी 30 वर्षांत पाच फूट रुंद आणि तीन फूट खोल कालवा बनविला आणि हजारो लोकांच्या अडचणी सोडवल्या.