शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सॅल्यूट! 70 वर्षांच्या शेतकऱ्यानं डोंगर कापून बनवला 5 किमी लांबीचा कालवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 14:24 IST

आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे.

बिहारमधील माऊंटन मॅन दशरथ मांझी यांचे नाव प्रसिद्ध आहे. ज्यांनी 22 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एक हातोडा आणि छिन्नीसह 360 फूट लांब,  30 फूट रुंद आणि 25 फूट उंच डोंगर कापून रस्ता बनवला. अशाच एका 70 वर्षीय लौंगी भुईया यांनी खेड्यातील शेकडो लोकांच्या अडचणीवर आपल्या कष्टाने मात केली. 30 वर्षांच्या मेहनतीने डोंगर कापून पाच किलोमीटर लांबीचा कालवा बनविला. आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे.

बिहार, गया येथील रहिवासी लौंगी भुईया यांनी कठोर परिश्रम घेऊन एक अनोखं उदाहरण समोर ठेवले आहे, जे कायम लक्षात ठेवले जाईल. 30 वर्ष कष्ट करून त्याने डोंगरावरून पडणा-या पावसाचे पाणी गोळा करून ते गावात आणलं. तो दररोज घरातून निघून थेट जंगलावर जात होता आणि एकट्यानं त्यांनी कालवा बांधण्यास सुरुवात केली. कोठीलवा गावचा रहिवासी असलेला लौंगी भुईया आपला मुलगा, सून आणि पत्नीसमवेत राहतो. भुईयांनी सांगितले की, पहिल्यांदा कुटुंबातील लोकांनी त्याला खूप विरोध केला. पण त्याने ऐकले नाही व कालवा खोदण्याचं काम सुरूच ठेवलं.

वास्तविक या भागात पाण्याअभावी लोक केवळ मका आणि हरभरा पिकवत असत. अशा परिस्थितीत गावातील सर्व तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात खेड्यातून शहरात जात होते. कामाच्या शोधात बरेच लोक खेड्यापासून दूर गेले. त्याच वेळी त्यांच्या मनात असा विचार आला की, इथे पाण्याची व्यवस्था असेल तर लोकांचे स्थलांतर रोखता येईल. कठोर परिश्रमानंतर आज कालवा तयार झाला असून, या भागातील तीन गावांतील तीन हजार लोकांना याचा फायदा होत आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जेव्हा केव्हा आम्ही पाहिलं, तेव्हा ते घरात कमी आणि जंगलात जास्त दिसले. त्याचबरोबर लौंगी भुईया यांचे म्हणणे आहे की, जर सरकार काही मदत देऊ शकली तर शेतीसाठी ट्रॅक्टरसारख्या सुविधा मिळू शकतील. शेतीसाठी नापीक जमीन सुपीक बनवू शकेल, ज्यामुळे लोकांना खूप मदत होईल. त्याच वेळी लौंगी भुईया यांच्या कार्यामुळे प्रत्येक जण प्रभावित झाला आहे. आज त्यांचे नाव देशाच्या कानाकोप-यात घेतले जात आहे. प्रत्येक जण त्यांना अभिवादन करीत आहे. ज्यांनी 30 वर्षांत पाच फूट रुंद आणि तीन फूट खोल कालवा बनविला आणि हजारो लोकांच्या अडचणी सोडवल्या.