बिहार विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रीय जनता दलाच्या दारुण पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आता विकोपाला गेला आहे. रोहिणी आचार्य यांनी आपले भाऊ तेजस्वी यादव आणि त्यांच्या दोन निकटवर्तीयांवर (संजय यादव आणि रमीज) अपमान केल्याचे आणि शिवीगाळ केल्याचे गंभीर आरोप करत कुटुंबाशी आणि राजकारणाशी संबंध तोडल्याचे जाहीर केल्यानंतर, आता लालूंच्या आणखी तीन मुलींनी पाटणा सोडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी आचार्य यांच्या पाठोपाठ लालू यादव यांच्या कन्या रागिणी यादव, चंदा यादव आणि राजलक्ष्मी यादव यांनीही तातडीने आपली मुले व कुटुंबीयांसह पाटणा येथील निवासस्थान सोडले असून, त्या दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
लालू कुटुंबातील चार मुलींनी एकाचवेळी पाटणा सोडणे हा केवळ कौटुंबिक वाद नसून, तो पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात तेजस्वी यादव यांच्यावर बहिणींनी टाकलेला बहिष्कार मानला जात आहे.
चिराग पासवान यांची मध्यस्थीची हाक
लालू कुटुंबातील या मोठ्या संघर्षावर लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी या कौटुंबिक वादावर मत व्यक्त केले. "राजकीय मतभेद असले तरी, लालूजींचे कुटुंब हे माझेही कुटुंब आहे," असे चिराग पासवान म्हणाले. एका मुलीला जेव्हा तिच्या माहेरी अपमानित वाटते, तेव्हा तिला किती दुःख होते, हे मी समजू शकतो. "मी प्रार्थना करतो की लालूजींचे कुटुंब लवकरच एकत्र यावे," असे आवाहन त्यांनी केले.
रोहिणी आचार्य यांनी आपल्या भावनिक पोस्टमध्ये, "मला माहेरून उपटून फेकले आहे" आणि "आत्मसन्मानाला धक्का पोहोचला" असे नमूद केले होते. रोहिणी आणि आता इतर तीन बहिणींच्या पाटणा सोडण्याच्या निर्णयामुळे आरजेडीच्या नेतृत्वावर आणि तेजस्वी यादव यांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Web Summary : Following a public fallout, Tejashwi Yadav's sisters, including Rohini Acharya, have left their Patna home amid RJD's election defeat and internal family conflicts. Chirag Paswan offered support, highlighting the family's distress. The mass departure raises questions about Tejashwi's leadership.
Web Summary : राजद की हार के बाद, तेजस्वी यादव की बहनें, रोहिणी आचार्य समेत, पारिवारिक विवादों के चलते पटना स्थित घर छोड़ गईं। चिराग पासवान ने समर्थन जताया, परिवार की पीड़ा पर प्रकाश डाला। इस घटना से तेजस्वी के नेतृत्व पर सवाल उठते हैं।