शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:30 IST

Bihar Assembly Election Votes: महाआघाडीत राजदने व्यक्तिगत स्तरावर सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान निश्चित केले असले तरी, संपूर्ण आघाडीला बहुमत मिळवता आले नाही.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी अनेक राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. राजद नेते तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते, या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाचा अत्यंत निराशाजनक 'स्ट्राइक रेट' आणि तेजस्वी यादव यांचा काँग्रेसवरील प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणे हे असल्याचे सांगितले जात आहे. 

महाआघाडीत राजदने व्यक्तिगत स्तरावर सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान निश्चित केले असले तरी, संपूर्ण आघाडीला बहुमत मिळवता आले नाही. राजदला मतदारांचा भाजपपेक्षाही जास्त पाठिंबा मिळाला आहे. परंतू, त्यांच्या जागा कमी आल्या आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार राजदला २२.७३ टक्के मतदान झाले आहे, तर भाजपला २०.८० टक्के मतदान झाले आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयुला १८.८३ टक्के मतदान झाले आहे. देशपातळीवरील पक्ष काँग्रेसला केवळ 8.56 टक्के मते मिळाली आहेत. ही सर्वात निराशाजनक बाब ठरली आहे. 

महाआघाडीमध्ये काँग्रेसला ६० हून अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस पक्षाने अत्यंत कमी जागांवर विजय मिळवला आहेच, परंतू मतदानही कमीच घेतले आहे. ज्या जागा काँग्रेसला देण्यात आल्या, त्यापैकी बहुतांश जागांवर काँग्रेसला मतदारांना आपल्याकडे वळवण्यात अपयश आल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. 

बिहारमध्ये भाजपा जवळपास ९६ जागांवर आघाडीवर आहे, तर जदयू ८४ जागांवर आघाडीवर आहे. परंतू. यांच्यापेक्षा कितीतरी मते जास्त मिळविणारा राजद मात्र २४ वरच अडकला आहे. याचाच अर्थ राजदला जिथे पडली तिथे खूप मते पडली आहेत, परंतू जिथे हवी होती तिथे कमी मते पडल्याने त्याचा फायदा भाजपा आणि जदयूला झालेला आहे. NDA ने २०० हून अधिक जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 

तेजस्वींना आता काय करावे लागेल?तेजस्वी यादव यांनी त्यांच्या 'जॉब्स' आणि 'युवा' या घोषणांच्या आधारावर राज्यात एक नवीन लाट निर्माण केली असली तरी, लालू प्रसाद यादव यांच्या जुन्या 'जंगलराज'च्या प्रतिमेपासून ते पूर्णपणे दूर राहू शकले नाहीत. तसेच, एका कमकुवत पक्षावर अधिक अवलंबून राहिल्याने त्यांना मोठा फटका बसला. या निकालानंतर तेजस्वी यादव यांना आता आपल्या पक्षाची संघटन क्षमता वाढवावी लागेल आणि भविष्यात मित्रपक्षांची निवड अधिक विचारपूर्वक करावी लागणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Despite More Votes, Why Tejashwi's Alliance Lost to BJP?

Web Summary : Tejashwi Yadav's alliance lost despite more votes than BJP due to Congress's poor performance. RJD secured most seats but lacked majority. Reliance on a weak Congress and lingering 'Jungle Raj' image hindered Tejashwi's victory. He needs stronger organization and better alliance choices.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Tejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेसBJPभाजपा