मोठी बातमी! आता सार्वजनिक कार्यक्रमात पूर्ण 'वंदे मातरम्' अनिवार्य; केंद्र सरकारकडून नवी नियमावली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 09:27 IST2026-02-11T09:18:06+5:302026-02-11T09:27:13+5:30
केंद्र सरकारने अधिकृत कार्यक्रमांमध्ये "वंदे मातरम्" हे राष्ट्रगीत गायन आणि वाजवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एकूण ३ मिनिटे आणि १० सेकंद कालावधी असलेल्या या गाण्याच्या सहा कडव्यांना आता सरकारी कार्यक्रमांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.

मोठी बातमी! आता सार्वजनिक कार्यक्रमात पूर्ण 'वंदे मातरम्' अनिवार्य; केंद्र सरकारकडून नवी नियमावली जाहीर
सरकारने अधिकृत प्रसंगी ३ मिनिटे १० सेकंदांच्या ‘वंदे मातरम्’च्या सहा कडव्यांचे वादन किंवा गायन अनिवार्य केले आहे. हा नियम राष्ट्रध्वज फडकावण्याच्या वेळी, कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींच्या आगमनाप्रसंगी तसेच राष्ट्राला उद्देशून दिल्या जाणाऱ्या भाषणांपूर्वी आणि नंतर लागू राहणार आहे. याबाबत केंद्र सरकारने नवा आदेश काढला आहे.
भारतासाठी गुड न्यूज! करारातून डाळी वगळल्या; व्हाईट हाऊसने 'Committed' शब्दही वगळला
याव्यतिरिक्त, राज्यपालांच्या आगमनाच्या वेळी तसेच त्यांच्या भाषणांपूर्वी आणि नंतरही समान निर्धारित कालावधी व कडवी अनिवार्य करण्यात आली आहे. या सरकारी आदेशाचा उद्देश अधिकृत प्रोटोकॉलचा एक भाग म्हणून राष्ट्रगीताचा आदर राखणे आणि त्याच्या सादरीकरणात एकरूपता सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे आता सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये हे गीत विहित वेळेच्या मर्यादेत गायले किंवा वाजवले जाणार आहे.
कडवे पहिले
वन्दे मातरम्। सुजलां सुफलां मलयजशीतलाम्। शस्यशामलां मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं। फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं। सुहासिनीं सुमधुर भाषिणीं। सुखदां वरदां मातरम्।। वन्दे मातरम्।।
कडवे दुसरे
वन्दे मातरम्। कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले। कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले। अबला केन मा एत बले। बहुबलधारिणीं नमामि तारिणीं। रिपुदलवारिणीं मातरम्।। वन्दे मातरम्।।
कडवे तिसरे
वन्दे मातरम्। तुमि विद्या, तुमि धर्म। तुमि हृदि, तुमि मर्म। त्वं हि प्राणाः शरीरे। बाहुते तुमि मा शक्ति। हृदये तुमि मा भक्ति। तोमारई प्रतिमा गडि। मन्दिरे-मन्दिरे मातरम्।। वन्दे मातरम्।।
कडवे चौथे
वन्दे मातरम्। त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी। कमला कमलदलविहारिणी। वाणी विद्यादायिनी। नमामि त्वाम्। नमामि कमलां अमलां अतुलां। सुजलां सुफलां मातरम्।। वन्दे मातरम्।।
कडवे पाचवे
वन्दे मातरम्। श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां। धरणीं भरणीं मातरम्। शत्रु-दल-वारिणीं। मातरम्।। वन्दे मातरम्।।
कडवे सहावे
वन्दे मातरम्। त्वं हि शक्ति, त्वं हि शक्ति। त्वं हि शक्ति मातरम्। वन्दे मातरम्।।
'वंदे मातरम्' हे मूळतः संपूर्ण भारताचे राष्ट्रगीत नव्हते, तर ते बंगालसाठी एक गाणे म्हणून सुरू झाले, असा अनेकांनी दावा केला होता. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गाणे संस्कृत भाषेत लिहिले आणि ७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंगदर्शन या जर्नलमध्ये प्रकाशित केले. नंतर ते त्यांच्या आनंदमठ (१८८२) या कादंबरीत प्रकाशित झाले.