शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Amit Shah: महिला दिनी मोठं गिफ्ट, 'या' राज्यातील महिलांना सरकारी नोकरीत 33% आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:21 IST

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यासोबतच, सुंदर राज्य असलेल्या त्रिपुरालाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

मुंबई - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुरातीलमहिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडीला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आणि महिला दिनाचे औचित्य साधून अमित शहा यांनी राज्यातील सरकारी नोकरीमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्रिपुरातील एका सभेला संबोधित करताना शहा यांनी राज्यातील भाजपप्रणित सरकारने केलेल्या कामांचा पाढाच वाचला. तसेच, आगरतलाला देशातील रेल्वेमार्गाने इतर प्रदेशांसोबत जोडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यासोबतच, सुंदर राज्य असलेल्या त्रिपुरालाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 25 वर्षांपासून त्रिपुरामध्ये कम्युनिष्टांनी सरकार चालवले. यापूर्वी 2015 मध्ये मी जेव्हा येथे आलो होतो, तेव्हा येथील जनता त्रस्त असल्याचं दिसून आल्याचे अमित शहा यांनी म्हटले. राज्यात गरिबांच्या नावाने कम्युनिष्टांनी 25 वर्षे येथे राज्य कारभार केला. मात्र, गरिबांसाठी काहीच केलं नाही. याउलट भाजपसह इतर 39 कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम कम्युनिष्टांनी केलं. त्याचवेळी भाजपने येथे मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली.  मी इंटेरियर त्रिपुरामध्ये पहिल्यांदाच चलो पटलाईचा नारा दिला, त्यावेळी लोकांमध्ये मोठा उत्साह होता. तेव्हाच येथे परिवर्तन होणार हे दिसून आले. 4 वर्षांपूर्वी येथे भाजपचं सरकार बनलं, तत्पूर्वी ड्रग्ज आणि नशेच्या कारभाराने हा प्रदेश त्रस्त होता. मात्र, आज त्रिपुरा आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे. त्रिपुरातील प्रत्येक गरिबाच्या घरात वीज पोहोचविण्याचं काम भाजपने केलंय. आता, माता-भगिनींना 33 टक्के आरक्षण देण्याचं काम भाजप सरकारने केलंय, असेही शहा यांनी म्हटले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहTripuraत्रिपुराWomenमहिलाreservationआरक्षण