शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Big Breaking: : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 12:14 PM

एकीकडे भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले असताना राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी आली आहे.

जयपूर/मुंबई - एकीकडे भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले असताना राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी आली आहे. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे. जयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत बहुतांश आमदारांनी भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. 

काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आज जयपूरमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांमध्ये एकमत झाले. या बैठकीला उपस्थित असलेल्या बहुतांश आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सहमती दर्शवली. मात्र सद्यस्थितीत याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

दरम्यान, शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयाबाबत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांकडे विचारणा केली असता त्यांनी अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले. आज संध्याकाळी दिल्लीहून दोन निरीक्षक येत आहेत, ते सगळ्या आमदारांशी बोलतील, नेत्यांशी बोलतील आणि दिल्लीत सोनिया गांधींना अहवाल देतील,  त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होईल, असे या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. 

काँग्रेसने शिवसेनेबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील महाशिवआघाडीचे सरकार सत्तेवर येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दरम्यान, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक केले होते. तसेच काँग्रेस ही काही राज्याची दुश्मन नसल्याचेही सांगितले होते. ''राज्यात स्थिर सरकार यावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस ही काही राज्याची दुश्मन नाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्याच्या विकासात योगदान दिले आहे. आमच्यात काही प्रश्नांवरून मतभेद आहेत. तसे ते भाजपासोबतही आहेत. देशासंबंधीच्या काही प्रश्नांबाबत भाजपा आणि आमची भूमिका वेगवेगळी होती.'' असे संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019