शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे कोरोना संकटकाळात नागरिकांचे मनोबल वाढणार : गोविंदगिरी महाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 13:31 IST

संपूर्ण देश गेली कित्येक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे.

ठळक मुद्देयेत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी पूर्ण

पुणे : अयोध्येतील राममंदिर हा फक्त मंदिर आणि एका वास्तूचा प्रश्न नाही तर स्वाभिमानाचा विषय आहे. कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत देशातील लोकांचे मनोबल वाढले पाहिजे आणि राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमामुळे देशातील लोकांचं मनोबल नक्कीच वाढणार आहे. या मंदिराच्या निर्मिती प्रक्रियेमुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे.हा भूमिपूजनाचा निर्णय राष्ट्राचा मनोबल वाढवणारा आहे. कोरोनाशी दोन हात करताना औषधासह हा महत्वाचा उपाय ठरणार आहे, असे मत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गोविंदगिरी महाराज म्हणाले, संपूर्ण देश गेली कित्येक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आलाय. १६१ फूट उंच, २ मजले मंदिर व त्यावर शिखर असे मंदिराचे स्वरुप असणार आहे. आरंभापासून तीन ते साडे तीन वर्षी राम मंदिर उभारणीला लागतील. नवीन राममंदिर स्वरूप बदललं आहे त्यामुळे तीन वर्षे लागणार आहे. सर्व भारतीय परंपरेनेच होईल.निर्मिती प्रक्रियेत १०८ एकर जमीन असेल,त्यात काही दान म्हणून येईल,काही विकत घ्यावी लागेल. यापैकी आठ एकरात मंदिर निर्माण होणार आहे. तत सर्व देशाचं प्रतिबिंब दिसले पाहिजे असे साकारण्यात येणार आहे. प्रत्यक्षात हे मंदिर २ एकरामध्ये असणार आहे. येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. गुजरातमधील सोमपुरा परिवाराकडून हे बांधण्यात येणार आहे. निमंत्रण कुणाला द्यायचं, नाही द्यायचं याची यादी तयार करण्याचं काम सुरू आहे.

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं तर हे सगळे हेलिकॉप्टरने येतील. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरत्या स्थळी आली तर त्यांची व्यवस्था करणे शक्य होणार नाही..पण तरीही ज्यांना यायचं असेल त्यांचं स्वागत असेल असेही गोविंदगिरी महाराज म्हणाले. 

 

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस