शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:13 IST

Rahul Gandhi News: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोबाईल वरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी मुरादाबाद, अमरोहा येथून संभलमध्ये पोहोचली. यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे स्वागत केले. 

राहुल गांधी यांनी येथे सभेला संबोधित करताना एका तरुणाला विचारले की, तू दिवसभर किती वेळ मोबाईल चालवतो. त्यावर तो तरुण म्हणाला की, १२ तास. त्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, भारतात रोजगार नाही तेव्हाच तुम्ही १२ तास मोबाईल चालवता. तुम्हाला माहित आहे का? मोठमोठ्या व्यापाऱ्यांची मूलं रील पाहत नाहीत. तर २४ तास पैसे मोजतात. जर तुम्हाला रोजगार मिळाला तर तुम्ही अर्धातास रील पाहाल आणि १२ तास काम कराल. 

अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय समाजातील व्यक्ती उच्च पदावर नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, जर आपण देशातील कुठल्याही कंपनीमधील कर्मचाऱ्यांची यादी काढली. मालकांची यादी काढली तर एकही मागास, दलित सापडणार नाही. माध्यमातील घराणी, रिपोर्टरची यादी काढली, खासगी कॉलेज आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची यादी काढली तर या पदांवरही उच्च जातींमधील तीन-चार टक्के लोक पदांवर असल्याचे दिसून येते. सध्या देशांमध्ये छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर संपवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राjobनोकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश