शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दोन कंपन्यांसोबतचे करार रद्द; भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर भारत बायोटेकचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 22:13 IST

कोवॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकनं दोन कंपन्यांसोबतचे करार रद्द केले

नवी दिल्ली: कोवॅक्सिन लसीचं उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेकनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत बायोटेकनं प्रेसिसा मेडिकामेंटोस आणि एनविक्सिया फार्मास्युटिकल्स या दोन कंपन्यांसोबतचा करार रद्द केला आहे. ब्राझीलमध्ये कोवॅक्सिन विकण्यासाठी भारत बायोटेकनं या दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले होते. मात्र आता दोन्ही कंपन्यांसोबतचे करार रद्द करण्यात आले आहेत. ब्राझीलची राष्ट्रीय आरोग्य एजन्सी अन्विसासोबत काम सुरू ठेवू आणि लसीसाठी आवश्यक असलेली मंजुरी प्रक्रिया पूर्ण करू, असं भारत बायोटेकनं सांगितलं आहे.

भारत बायोटेककडून ब्राझीलला कोरोना लसीचे दोन कोटी डोस दिले जाणार होते. त्यासाठी ब्राझील सरकारसोबत करारदेखील झाला. मात्र हा करार वादग्रस्त ठरला. करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप झाल्यानं ब्राझील सरकारनं करार रद्द केला. याबद्दलची घोषणा ब्राझीलच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली. भारत बायोटेकसोबतचा लस पुरवठ्याचा करार रद्द करण्यात येत असल्याची घोषणा २९ जूनला करण्यात आली. 

भारत बायोटेकसोबतचा करार रद्द करण्यात आल्यानंतर देशातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची गती मंदावणार नाही, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं होतं. याबद्दल भारत बायोटेकनंदेखील स्पष्टीकरण दिलं होतं. '२९ जून २०२१ पर्यंत भारत बायोटेकला कोणताही आगाऊ रक्कम मिळालेली नाही. याशिवाय कंपनीनं ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाला लसींचा पुरवठादेखील केलेला नाही. कंपनी सर्व नियमांचं पालन करते. जगातील अनेक देशांत लस पुरवत असताना नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे', असं भारत बायोटेकनं म्हटलं आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या