शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी रिक्षाचालकाकडून अशी मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 18:39 IST

वातावरण किती खराब झालंय,असं आपण फक्त ओरडत असतो. पण यांनी त्यावर कृती केलीये.

ठळक मुद्देगरज असेल तिकडे नक्की हॉर्न वाजवावा. पण उगीचच ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर हॉर्न वाजवण्यात काय अर्थ आहे? ध्वनी प्रदुषणामुळेही माणसांना खूप त्रास होतो आणि काही चालक विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदुषणात वाढ करत असतात. 

बंगळुरू - सध्या सगळीकडेच प्रदुषणामुळे वातावरण खराब झालंय. देशातील मुख्य शहरात प्रदुषणाने उच्चांक पातळी गाठली आहे. गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये वाढलेलं प्रदुषणही त्यातीलच एक भाग आहे. पण वाढणाऱ्या प्रदुषणाला मनुष्यच जबाबदार आहे आणि आपणच हे प्रदुषण कमी करू शकतो असा विश्वास एका रिक्षा चालकाने व्यक्त केलाय. या रिक्षा चालकाने गेल्या २८ वर्षात एकदाही हॉर्न वाजवला नसल्याचा दावा केलाय. त्याच्या मते, ध्वनी प्रदुषणामुळेही माणसांना खूप त्रास होतो आणि काही चालक विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदुषणात वाढ करत असतात. 

बंगळुरूमध्ये राहणारे राजेश हे गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत आहेत. बंगळुरुमध्येही प्रदुषण वाढलं आहे. पण ते म्हणतात की, देशातील प्रत्येक राज्यातील सगळ्यात वाईट परिस्थिती सध्या ध्वनी प्रदुषणाची आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढल्याने वायू प्रदुषणासोबतच ध्वनी प्रदुषणाचीही समस्या वाढीला लागलीय. गाड्यांमधून निघणारा हॉर्नचा आवाज हा केव्हा केव्हा मर्यादेपेक्षा जास्त असतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्यातरी कोणतीच यंत्रणा नाहीए. त्यामुळे दिवसेंदिवस हे ध्वनी प्रदुषण वाढत जाईल, असं राजेश सांगतात. 

ते म्हणतात,‘२८ वर्षांपूर्वीच मी हॉर्न वाजवणं सोडून दिलंय. १९८८ साली शेवटचा हॉर्न वाजवला, त्यानंतर आपण विनाकारण हॉर्न वाजवून कित्येकांना त्रास देतोय असं वाटू लागलं आणि हॉर्न वाजवणंच बंद केलं. मी काही वर्ष परदेशात काम केलंय. मोठ्याने हॉर्न वाजवणं म्हणजे विनाकारण दुसऱ्यांवर ओरडण्यासारखं आहे. आपल्याकडे अनेक अंध व्यक्ती प्रवास करत असतात. त्यांना दिसत नसलं तरी त्यांची श्रवणयंत्रणा फार मजबूत असते. त्यांना प्रत्येक लहान लहान आवाजाचा अंदाज येत असतो. आपण अशाप्रकारे हॉर्न वाजवल्याने ते बाचकू शकतात. त्यामुळे विनाकारण हॉर्न वाजवणं सोडून दिलं पाहिजे.’

गरज असेल तिकडे नक्की हॉर्न वाजवावा. पण उगीचच ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर हॉर्न वाजवण्यात काय अर्थ आहे? असं विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना ते नेहमीच रोखतात. ते याबाबत कोणालाही जबरदस्ती करू शकत नाहीत, मात्र त्यांच्यामुळे एखादातरी चालक सुधारला तरी त्यांना बरं वाटले असं राजेश सांगतात. 

सौजन्य - thelogicalindian.com

टॅग्स :environmentवातावरणpollutionप्रदूषण