शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी रिक्षाचालकाकडून अशी मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 18:39 IST

वातावरण किती खराब झालंय,असं आपण फक्त ओरडत असतो. पण यांनी त्यावर कृती केलीये.

ठळक मुद्देगरज असेल तिकडे नक्की हॉर्न वाजवावा. पण उगीचच ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर हॉर्न वाजवण्यात काय अर्थ आहे? ध्वनी प्रदुषणामुळेही माणसांना खूप त्रास होतो आणि काही चालक विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदुषणात वाढ करत असतात. 

बंगळुरू - सध्या सगळीकडेच प्रदुषणामुळे वातावरण खराब झालंय. देशातील मुख्य शहरात प्रदुषणाने उच्चांक पातळी गाठली आहे. गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये वाढलेलं प्रदुषणही त्यातीलच एक भाग आहे. पण वाढणाऱ्या प्रदुषणाला मनुष्यच जबाबदार आहे आणि आपणच हे प्रदुषण कमी करू शकतो असा विश्वास एका रिक्षा चालकाने व्यक्त केलाय. या रिक्षा चालकाने गेल्या २८ वर्षात एकदाही हॉर्न वाजवला नसल्याचा दावा केलाय. त्याच्या मते, ध्वनी प्रदुषणामुळेही माणसांना खूप त्रास होतो आणि काही चालक विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदुषणात वाढ करत असतात. 

बंगळुरूमध्ये राहणारे राजेश हे गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत आहेत. बंगळुरुमध्येही प्रदुषण वाढलं आहे. पण ते म्हणतात की, देशातील प्रत्येक राज्यातील सगळ्यात वाईट परिस्थिती सध्या ध्वनी प्रदुषणाची आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढल्याने वायू प्रदुषणासोबतच ध्वनी प्रदुषणाचीही समस्या वाढीला लागलीय. गाड्यांमधून निघणारा हॉर्नचा आवाज हा केव्हा केव्हा मर्यादेपेक्षा जास्त असतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्यातरी कोणतीच यंत्रणा नाहीए. त्यामुळे दिवसेंदिवस हे ध्वनी प्रदुषण वाढत जाईल, असं राजेश सांगतात. 

ते म्हणतात,‘२८ वर्षांपूर्वीच मी हॉर्न वाजवणं सोडून दिलंय. १९८८ साली शेवटचा हॉर्न वाजवला, त्यानंतर आपण विनाकारण हॉर्न वाजवून कित्येकांना त्रास देतोय असं वाटू लागलं आणि हॉर्न वाजवणंच बंद केलं. मी काही वर्ष परदेशात काम केलंय. मोठ्याने हॉर्न वाजवणं म्हणजे विनाकारण दुसऱ्यांवर ओरडण्यासारखं आहे. आपल्याकडे अनेक अंध व्यक्ती प्रवास करत असतात. त्यांना दिसत नसलं तरी त्यांची श्रवणयंत्रणा फार मजबूत असते. त्यांना प्रत्येक लहान लहान आवाजाचा अंदाज येत असतो. आपण अशाप्रकारे हॉर्न वाजवल्याने ते बाचकू शकतात. त्यामुळे विनाकारण हॉर्न वाजवणं सोडून दिलं पाहिजे.’

गरज असेल तिकडे नक्की हॉर्न वाजवावा. पण उगीचच ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर हॉर्न वाजवण्यात काय अर्थ आहे? असं विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना ते नेहमीच रोखतात. ते याबाबत कोणालाही जबरदस्ती करू शकत नाहीत, मात्र त्यांच्यामुळे एखादातरी चालक सुधारला तरी त्यांना बरं वाटले असं राजेश सांगतात. 

सौजन्य - thelogicalindian.com

टॅग्स :environmentवातावरणpollutionप्रदूषण