Bengaluru Stampede : "दिव्यांशीला विराट कोहलीला पाहायचं होतं..."; आईने सांगितलं चेंगराचेंगरीच्या वेळी काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:14 IST2025-06-05T14:13:11+5:302025-06-05T14:14:35+5:30
Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत दिव्यांशीचाही मृत्यू झाला आहे. तिच्या आईने स्टेडियमबाहेर नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.

Bengaluru Stampede : "दिव्यांशीला विराट कोहलीला पाहायचं होतं..."; आईने सांगितलं चेंगराचेंगरीच्या वेळी काय घडलं?
बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएल विजयाच्या जल्लोषादरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत दिव्यांशीचाही मृत्यू झाला आहे. तिच्या आईने स्टेडियमबाहेर नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
"पायलट किंवा डॉक्टर व्हायचं दिव्यांशीच स्वप्न होतं. ती खूप चांगली होती. मी कोणालाही दोष देऊ शकत नाही. स्टेडियमच्या आत जाण्याचा आमचा कोणताही प्लॅन नव्हता. आम्ही आरामात फूटपाथवर बसून पाहत होतो. दिव्यांशीला क्रिकेटची खूप आवड होती. ती क्रिकेट खेळाडूंबद्दल सर्व काही सांगायची. तिला विराट कोहलीला पाहायचं होतं" अशी माहिती दिव्यांशीच्या आईने दिली.
"मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो
"मला तिचा अभिमान"
"मला श्वास द्यायला त्रास होत होता. मी एका व्यक्तीला वाचवलं. फक्त ५ मिनिटं त्यामध्ये गेली. तेव्हा ती तिथे नव्हती. मला वाटलं की, ती आतमध्ये गेली आहे. शिक्षकांना तिचा खूप अभिमान वाटत होता. फक्त २ वर्षे झाली होती तिला नवीन शाळेत जाऊन, मला तिचा अभिमान आहे, ती माझ्यासाठी एक आदर्श होती, माझ्यासाठी एक देवदूत होती."
“मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू
"जास्त पोलीस तैनात करण्यात आले नव्हते"
"माझं अनमोल रत्न होती, परी होती. मी वाहतूक पोलिसांना दोष देईन कारण ही परिस्थिती कशी हाताळायची हे त्यांना माहित नव्हतं का? जास्त पोलीस तैनात करण्यात आले नव्हते. गर्दी हाताळण्याचा प्रयत्न कोणीही करत नव्हतं. हे सर्व घडत असताना सरकार आत आनंद साजरा करणं हे वेडेपणा होतं. मानवता आतमध्ये असली पाहिजे, आपण ती निर्माण करू शकत नाही" असं देखील दिव्यांशीच्या आईने म्हटलं आहे.
"काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?
शिवलिंग स्वामीचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे. तो मूळचा यादगीर जिल्ह्यातील होता आणि सध्या ते बंगळुरूच्या येलहंका येथे त्यांच्या कुटुंबासह राहत होता. त्याने यावर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि पीयूसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळेतून त्यांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) आणणार असल्याचे सांगून घरातून गेला होता. पण त्यानंतर तो चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेला आणि चेंगराचेंगरीत त्याचा मृत्यू झाला.