शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

भाजपला टक्कर देण्यासाठी तृणमूलनं बदलली रणनीती; राज्य वाचवू शकणार का ममता दीदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 4:23 AM

मावळत्या वर्षातील मोठा बदल; बदलत्या राजकारणात ममता बॅनर्जींचा नवा पवित्रा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडारे पाडली हा या राज्याच्या राजकारणातील यंदाच्या वर्षातला सर्वात मोठा बदल आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर सर्वसमावेशकतेची भूमिका बाजूला ठेवून बंगाली अस्मितेचा उदोउदो करीत राजकारण करायची पाळी आली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये केवळ दोन जागा जिंकता आलेल्या भाजपने २०१९ च्या निवडणुकांत त्या राज्यातील ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळविला. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची आस असलेल्या तृणमूल काँग्रेसला या पराभवामुळे आपली भूमिका बदलणे भाग पडले.तृणमूल काँग्रेसला २२ जागांवर विजय मिळाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जिंकलेल्या जागांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला लोकसभेच्या १२ जागा गमवाव्या लागल्या. या निवडणुकांत राज्यामध्ये भाजप, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकीही झाल्या. राज्यात भाजपचा वाढता प्रभाव पाहून अस्वस्थ झालेल्या ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षाची कामगिरी उत्तम व्हावी यासाठी आखणी सुरू केली आहे. त्यांच्या सरकारने विविध नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू केली. याचाच भाग म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता बंगाली अस्मितेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. बदलत्या राजकारणात ममता बॅनर्जी कोणता निर्णय घेणार ते आगामी काळात दिसणार आहे. (वृत्तसंस्था)एनआरसी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोधदेशभरात हिंदी भाषा सर्वात जास्त बोलली जात असल्याचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. एक देश एक भाषा या सूत्राचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुरस्कार केला होता. हिंदी भाषा देशाच्या एकात्मतेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही ते म्हणाले होते.त्याला दक्षिण भारतातील राज्यांबरोबरच ममता बॅनर्जी यांनीही विरोध केला. केंद्र सरकारने हिंदी भाषा बंगाली जनतेवर लादली आहे, असा प्रचार तृणमूल काँग्रेसने सुरू केला. त्यावर शहा यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे म्हटले होते.माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या प्रमुखपदी तसेच अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रासाठी मिळालेले नोबेल हा बंगाली लोकांसाठी अभिमानाचा क्षण आहे, असे ममता बॅनर्जी यांनी आवर्जून सांगितले होते.आसाममध्ये राबविण्यात येणारी एनआरसी योजना तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. जाहीर सभा घेतल्या. त्यामध्ये भाजप हा बंगालीविरोधी पक्ष आहे, असे आवर्जून सांगितले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा