Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:54 IST2025-06-14T16:53:51+5:302025-06-14T16:54:27+5:30
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलाला मेडिकलच्या शिक्षणासाठी अहमदाबादला पाठवलं पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं.

Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
बाडमेर जिल्ह्यातील बोर चरणन गावातील शेतकरी वडिलांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलाला मेडिकलच्या शिक्षणासाठी अहमदाबादला पाठवलं पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान ए१७१ उड्डाणानंतर काही वेळातच कोसळलं. या अपघातात जयप्रकाशचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी जयप्रकाश बीजी मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये जेवत होता.
जयप्रकाश चौधरी बीजी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. त्याची परीक्षा १६ जूनपासून सुरू होणार होती. त्याचे वडील धर्मराम शेती आणि मजूरीचं काम करतात. त्यांनी कर्ज घेऊन मुलाला वैद्यकीय शिक्षणासाठी कोटा येथे पाठवले होते. कोटामध्ये २ वर्षे तयारी केल्यानंतर तो नीट परीक्षा उत्तीर्ण झाला आणि अहमदाबादला अभ्यासासाठी गेला. तो २०२३ पासून अहमदाबादमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता.
"तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
असं सांगितलं जात आहे की, अपघातापूर्वी जयप्रकाशचे काही मित्र आंबे खरेदी करण्यासाठी बाहेर गेले होते, जे वाचले. त्याच्या मित्रांनी जयप्रकाशलाही बाहेर येण्यास सांगितलं होतं पण त्याने जेवणासाठी मेसमध्ये जाईन असं सांगून बाहेर जाण्यास नकार दिला. अपघातात जयप्रकाशचं शरीर ३० टक्क्यांपर्यंत भाजलं होतं. मात्र मातीचा ढिगारा त्याच्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
अहमदाबाद विमान अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. या दुर्घटनेत अहमदाबादचे रहिवासी अनिल पटेल यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा हर्षित आणि सून पूजा यांना गमावलं आहे, परंतु आता अनिल यांना एकच आशा आहे की, प्रशासन त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा मृतदेह लवकरच त्यांच्या स्वाधीन करेल.