शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 13:00 IST

राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणाऱ्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला.

ठळक मुद्देराम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबीयांनी गावच्या सरपंचांना बोलावून हवन केला. कुटंबीयांतील सर्वांची नावे हिंदू धर्मानुसार आहेत.

जयपूर : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी पार पडला. याचदरम्यान, राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणाऱ्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारणार्‍या कुटुंबातील वयस्कर लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे पूर्वज हिंदू होते. इतिहासाचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आहे.

हिंदू धर्माचे स्वीकार करणारे सुभनराम यांनी सांगितले की, "मुघल काळात त्यांच्या पूर्वजांना धमकावून मुस्लीम धर्म स्विकारण्यास भाग पाडले होते. मात्र याबाबत कळल्यानंतर आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला पुन्हा याच धर्मात जायचे आहे, असे ठरवले. तर, मुस्लिम आपल्यापासून अंतर ठेवतात. आमच्या प्रथा संपूर्ण हिंदू धर्माशी संबंधित आहेत. यानंतर संपूर्ण कुटुंबाने हिंदू धर्मात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर 50 मुस्लीम कुटुंबीयांतील 250 सदस्यांनी होम-हवन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला."

गावातील हरजीराम यांच्या म्हणण्यानुसार, कांचन ढाढ़ी जातीचे हे संपूर्ण कुटुंब बर्‍याच वर्षांपासून हिंदू रूढी-परंपरा  पाळत होते. दरवर्षी ते आपल्या घरात हिंदू सण साजरे करतात. याच कुटुंबीयातील विंजारम यांनी सांगितले की, "मुस्लीम रीति-रिवाजांनुसार आम्ही कोणतेही धार्मिक कार्य केले नाही. रामजन्मभूमी येथे राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी आम्ही सर्वांनी होम-हवनचा कार्यक्रम आयोजित केला आणि हिंदू संस्कृतीचा पाठपुरावा करून स्वेच्छेने हिंदू धर्मात परतलो. यासाठी कोणाचाही दबाव नाही."

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबीयांनी गावच्या सरपंचांना बोलावून हवन केला. कुटंबीयांतील सर्वांची नावे हिंदू धर्मानुसार आहेत. विंजाराम यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्या पूर्वजांना जबरदस्ती मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले होते. मात्र आता घरातील शिक्षित पिढीने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तसेच, हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली येऊन घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याचबरोबर, या कुटुंबातील सदस्य हरुराम यांनी सांगितले की, सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट आहेत. यातच राममंदिराचे भूमिपूजन झाले, या ऐतिहासिक क्षणाने सर्वांना आनंद दिला. आम्हीही घरात दिवे लावून, होम हवन करून हा दिवस साजरा केला. तर गावचे सरपंच प्रभुराम कलबी यांनी सांगितले की, या सर्वांनी स्वत: हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. भारतीय संविधानानुसार कोणतीही व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारू शकते. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याRajasthanराजस्थान