शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Video: काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा भाजपा आणि संघावर मोठा आरोप; म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 11:33 AM

मध्य प्रदेशातील भिंड येथे माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी दावा केला आहे

भिंड - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी देशातील मुस्लिमांपेक्षा गैर मुस्लीम लोक हेरगिरी करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपा, बजरंग दल अशा संघटना ISI कडून पैसे घेतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मध्य प्रदेशातील भिंड येथे माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी दावा केला आहे की, जितकेही लोक पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना सापडतात ते लोक बजरंग दल, भाजपा आणि आरएसएसकडून पैसे घेतात. आयएसआयकडून हेरगिरी करण्यासाठी मुस्लीम कमी पण इतर लोक जास्त आहेत हे समजून घ्यावं असं त्यांनी सांगितले. 

आम्हाला देशभक्ती शिकवू नकाभाजपावर खोटा देशभक्तीचा आरोप लावत दिग्विजय सिंह म्हणाले की, आमच्या विचारधारेची लढाई भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही ते आम्हाला देशभक्तीचे धडे देत आहेत. 1947 च्या पूर्वी हे लोक कुठे होते? जेव्हा इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले तेव्हा हे लोक कुठे होते? त्यामुळे आम्हाला देशभक्ती शिकवू नका असा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपाला लगावला आहे. 

मागील वर्षी दिग्विजय सिंह यांनी हिंदू दहशतवादाचा मुद्दा घेत भाजपावर निशाणा साधला होता. हिंदू धर्मातील दहशतवादी संघाशी जोडले गेले आहेत. हिंदू दहशतवादी आरएसएसच्या विचारसरणीतून येतात. द्वेषाची विचारधारा संघाकडून पसरविली जाते. जितके हिंदू दहशतवादी पकडले गेले ते संघाचे कार्यकर्ते आहेत. नथुराम गोडसे ज्याने महात्मा गांधींना मारले होते ते देखील आरएसएस विचारधारेचे होते असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला होता. 

तसेच संघ अन् भाजपाचे लोक जमावाला हिंसेसाठी भडकावतात. देशात हिंसा होण्याची दोन कारणं आहेत. लोकांना वेळेवर न्याय मिळत नाही, त्यामुळे लोक भडकलेले असतात. तर दुसरं कारण हे भाजपा आणि आरएसएसचे लोक आहेत. आरएसएसचे कार्यकर्ते जमावाला हिंसेसाठी भडकावतात असा दावाही दिग्विजय सिंह यांनी केला होता.  

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPakistanपाकिस्तानBJPभाजपाISIआयएसआय