शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:38 IST

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांतच तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांतच तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. तरुणाचं लग्न झाल्यानंतर १८ व्या दिवशी त्याच्या पत्नीने कुटुंबातील सदस्यांना नशा आणणारा पदार्थ खाऊ खातला आणि घरातून पळ काढला. घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने घेऊन ती बॉयफ्रेंडसोबत पसार झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. लग्नाच्या काही दिवसांनंतर पत्नी पळून गेल्यामुळे नैराश्यात असलेल्या पतीने गेल्या ७ दिवसांपासून खाणं-पिणं बंद केलं होतं. याच धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांचं म्हणणं आहे की, या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही लेखी तक्रार देण्यात आली नव्हती, आज हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि तपास केला जाईल.

२२ एप्रिल २०२५ रोजी अलापूर पोलीस स्टेशन परिसरातील हिमांशी उर्फ ​​मानसी नावाच्या मुलीशी रमेशचं लग्न झालं होतं. लग्नानंतर रमेशची पत्नी तासनतास फोनवर कोणाशी तरी बोलत असे. रमेशने विचारले असता ती तिच्या पालकांशी फोनवर बोलत असल्याचं सांगायची लग्नानंतर रमेश कामासाठी पंजाबला गेला. याचा फायदा घेत हिमांशी बॉयफ्रेंडसह पळून गेली.

पती रमेशला ही बाब कळताच तो दातागंज येथील त्याच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याने कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली आणि पत्नीवर आरोप केले आणि कारवाईची विनंती केली. परंतु पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. रमेशच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रमेशला यामुळे धक्का बसला होता आणि गेल्या एका आठवड्यापासून त्याने खाणे-पिणं बंद केलं होतं. तो रात्रभर झोपायचा नाही. त्याला याचा खूप मानसिक त्रास झाला होता.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस