शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:38 IST

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांतच तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांतच तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. तरुणाचं लग्न झाल्यानंतर १८ व्या दिवशी त्याच्या पत्नीने कुटुंबातील सदस्यांना नशा आणणारा पदार्थ खाऊ खातला आणि घरातून पळ काढला. घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने घेऊन ती बॉयफ्रेंडसोबत पसार झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. लग्नाच्या काही दिवसांनंतर पत्नी पळून गेल्यामुळे नैराश्यात असलेल्या पतीने गेल्या ७ दिवसांपासून खाणं-पिणं बंद केलं होतं. याच धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांचं म्हणणं आहे की, या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही लेखी तक्रार देण्यात आली नव्हती, आज हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि तपास केला जाईल.

२२ एप्रिल २०२५ रोजी अलापूर पोलीस स्टेशन परिसरातील हिमांशी उर्फ ​​मानसी नावाच्या मुलीशी रमेशचं लग्न झालं होतं. लग्नानंतर रमेशची पत्नी तासनतास फोनवर कोणाशी तरी बोलत असे. रमेशने विचारले असता ती तिच्या पालकांशी फोनवर बोलत असल्याचं सांगायची लग्नानंतर रमेश कामासाठी पंजाबला गेला. याचा फायदा घेत हिमांशी बॉयफ्रेंडसह पळून गेली.

पती रमेशला ही बाब कळताच तो दातागंज येथील त्याच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याने कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली आणि पत्नीवर आरोप केले आणि कारवाईची विनंती केली. परंतु पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. रमेशच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रमेशला यामुळे धक्का बसला होता आणि गेल्या एका आठवड्यापासून त्याने खाणे-पिणं बंद केलं होतं. तो रात्रभर झोपायचा नाही. त्याला याचा खूप मानसिक त्रास झाला होता.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस