शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 17:44 IST

दिल्लीतील प्रदूषण उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारमुळे होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील दिल्लीतील वाढत्या वायू आणि जलप्रदूषणावरुन दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील वायू प्रदूषणासोबतच यमुनेतील जलप्रदूषणही वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भाजपचे घाणेरडे राजकारण. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण भुसा जाळणे आहे. परंतु पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांनी भुसा जाळण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार भुसा जाळणे रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

दिल्लीच्या प्रदूषणाला इतर राज्ये जबाबदार आनंद विहार आयएसबीटीचे उदाहरण देताना आतिशी म्हणाल्या की, दिल्लीत सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात आहेत. इतर राज्यातून डिझेल बसेस येत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणासाठी त्यांनी उत्तर प्रदेश आणि हरियाणातील वीटभट्ट्या आणि औष्णिक वीज प्रकल्पांना जबाबदार धरले.

यमुनेतील वाढत्या फेस आणि प्रदूषणावर बोलताना आतिशी म्हणाल्या की, हरियाणातून 165 एमजीडी आणि उत्तर प्रदेशातून 55 एमजीडी औद्योगिक कचरा यमुनेमध्ये दररोज सोडला जातो, ज्यामुळे जलप्रदूषण वाढत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली सरकार सातत्याने काम करत आहे. भाजपने यासाठी कठोर पावले न उचलल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असेही त्या म्हणाल्या.

भाजप यमुना साफ करू देत नाहीआप नेते सत्येंद्र जैन यांनीही पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या सरकारने यमुना स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. भाजपला यमुना स्वच्छ होऊ द्यायची नाही, कारण त्यामुळे त्यांच्या राजकीय हितसंबंधांवर परिणाम होतो. हरियाणातून सुमारे 200 एमजीडी औद्योगिक सांडपाणी बादशाहपूर नाल्यातून पंप केले जाते आणि आम्ही आवाज उठवतो तेव्हा आम्हाला अटक केली जाते.

ते पुढे म्हणाले की, भाजपचे लोक फक्त फोटो काढायला येतात. यमुनेत फोम तयार होत नाही. कालिंदी कुंजवर यूपी सरकार बॅरेज चालवते, त्याचे दरवाजे बंद केल्यामुळे फेस तयार होत आहे. आता सर्व दरवाजे उघडा, फेस निघून जाईल. बनारसमध्ये दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीतील सर्व थर्मल पॉवर प्लांट बंद आहेत पण एनसीआरमध्ये औष्णिक वीज प्रकल्प सुरू आहेत आणि 3000 वीटभट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीAtishiआतिशीUttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणा