शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

चिमणे, ये गं परत घरी... बेपत्ता मुली आणि तस्करीचे भयाण वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:03 IST

पालकांनी मुलींबरोबर संवाद वाढवणे, त्यांना विश्वासात घेऊन सर्व बाबींवर चर्चा करणे महत्त्वाचे आहे. शाळा, कॉलेजांतही समुपदेशकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. अनेक मुली अन्य मुलींच्या सांगण्यावरून किंवा कोणी फसवल्याने पळून जातात. त्यांना वेळीच सावरून आनंदी जीवन जगायला मदत करणारी व्यक्ती असल्यास त्या घर सोडून जाणार नाहीत...

प्रवीण दीक्षितनिवृत्त पोलिस महासंचालक

लहान मुले व विशेषतः मुली बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पळविण्यात आल्याचीच शक्यता गृहीत धरून गुन्हा दाखल करावा व त्याप्रमाणे तपास करावा, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्याप्रमाणे पोलिस कारवाई करतात. महाराष्ट्रातील सर्व ठाण्यांत ‘मिसिंग सेल’ स्थापन करून प्रशिक्षित संवेदनशील अधिकारी, कर्मचारी नेमले आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या भारतीय पोलिस सेवेतील महिला अधिकारी तपासावर लक्ष ठेवतात व दर महिन्याला आढावा घेऊन तपास योग्य पद्धतीने करणाऱ्यांना प्रोत्साहन देतात. जेथे तपास नीट नसेल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावतात. 

नवजात बालकांना पळवता येऊ नये यासाठी रुग्णालयात सीसीटीव्ही आहेत. शाळांमधून मुले पळवली जाऊ नयेत यासाठी सर्व शाळांचे सुरक्षा ऑडिट करावे, असे आदेश १२ फेब्रुवारी २०२६ ला शासनाने दिले. स्त्रिया, मुले व नवजात बालके यांच्या तस्करीस प्रतिबंध घालण्यासाठी राज्यातील सर्व पोलिस घटकांमध्ये ‘अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग सेल’ स्थापन करण्यात आले आहेत. हे सर्व प्रयत्न केले जात असतानाही हजारोंच्या संख्येने मुली, महिला बेपत्ता होण्याच्या घटना घडतात. या संवेदनशील विषयावर विधिमंडळात नुकत्याच झालेल्या चर्चेत उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले की, हरवलेली प्रत्येक मुलगी शोधली जाईल, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील.

या उपायांचीही होऊ शकते मदत...

मागच्या वर्षी आषाढी एकादशी वारीच्या वेळी सोलापूर ग्रामीण येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे अतुल कुलकर्णी यांनी प्रत्येक वारकऱ्याची अचूक मोजणी केली. २० लाख वारकरी आले होते. त्यांनी ‘फेशियल रिकग्निशन सिस्टम’चा वापर करून चेन स्नॅचर्सना पकडले. याच धर्तीवर....

हरवलेल्या बेपत्ता मुलींचे फोटो अशा जत्रा, कुंभमेळा वगैरे गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध असतील तर ‘फेशियल रिकग्निशन सिस्टम’चा वापर करून त्यांना शोधून काढता येईल.

गृहखात्याने आयआयटी मुंबईला एआयचा वापर करून असा एक प्रोजेक्ट करायला प्रोत्साहन द्यावे.

आधार कार्डमुळे काय साध्य होईल? कसा लावता येईल बेपत्ता मुलींचा शोध?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे महाराष्ट्र व गोवा येथील मनोरुग्णालयांची तपासणी करण्याचे काम मला दिले होते. त्यावेळी रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सांगितले की, ओळखपत्राअभावी रुग्णांना कल्याणकारी योजनांचा फायदा मिळत नाही. तेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून त्यांना आधारकार्ड मिळवून देण्याची व्यवस्था केली. त्यावेळी लक्षात आले की अनेक रुग्णांची पूर्वीची आधारसाठीची नोंद उपलब्ध आहे. तिचा उपयोग करून त्यांना संबंधित पालकांपर्यंत पोहोचवता आले. याच धर्तीवर....

१. बेपत्ता होणाऱ्या प्रत्येक मुलीच्या आधार कार्डची माहिती जर बसस्थानके, रेल्वे स्टेशन्स, इमिग्रेशन चेक पोस्ट्स येथे देऊन तपासणी केली तर अनेक बेपत्ता मुले, मुली, महिला सापडू शकतील.

२. रेल्वे तिकीट काढताना सध्या फक्त प्रमुख व्यक्तीचा आधार क्रमांक विचारला जातो. त्यात बदल करून प्रत्येकाचा आधार क्रमांक घेणे जरुरीचे आहे.

३. बस, टॅक्सी प्रवासासाठीही आधार क्रमांक सक्तीचा करणे उपयोगी ठरेल. बेपत्ता मुलींना स्पा, डान्स बार, हॉटेल्स, कुंटणखाने अशा ठिकाणी वापरण्याची शक्यता असल्याने त्याठिकाणी आधार क्रमांकाची सक्ती केल्यास बऱ्याच मुली सापडतील.

या कारणांचाही विचार होणे गरजेचे...

आई-वडील दोघेही कामावर जात असल्याने पालक व वयात येणाऱ्या मुली यांच्यातील संवाद कमी होत चालला आहे. परिणामी, सिनेमात काम करणे, नोकरी, उच्च शिक्षण, मुलांबरोबर राहून त्यांचे प्रेमसंबंध अशा आकर्षणांमुळे मुली घरात न सांगता पळून जातात. 

परजातीय, परधर्मीय मुलांशी संपर्क ठेवल्यास ‘ऑनर किलिंग’सारख्या घटना घडून मुलींची हत्या करायला पालक कमी करीत नाहीत. त्यामुळेही मुली पळून जाण्याचा मार्ग चोखाळतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Missing Girls: A Grim Reality of Trafficking and Solutions

Web Summary : High court directs strict action on missing girls' cases. Facial recognition, Aadhaar linkage at transit points, and addressing communication gaps can help trace them. Focus on preventing trafficking at vulnerable locations like hotels and bars is crucial. Parental awareness is also key.
टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीIndiaभारत