शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

अयोध्येतील मशिदीच्या जमिनीवर अन्नधान्य पिकवून गरिबांना द्यावे : इक्बाल अन्सारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 3:20 PM

आमचं मान्य केल तर ठिक अन्यथा आम्ही ट्रस्टला विरोध करणार असल्याचे इक्बाल अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानुसार राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांना मशिद उभारण्यासाठी पाच एकर जमीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार रौनाही येथील धनीपूर भागात मुस्लीम समाजाला जमीन देण्यात आली आहे. मात्र या जमिनीचा उपयोग शेती करण्यासाठी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मशिदीसाठी देण्यात आलेल्या जमिनीला मुस्लीम पक्षकारांनी विरोध केला होता. मात्र सुन्नी वक्फ बोर्डाने समोर येऊन जमिनीचा स्वीकार केला. आता सुन्नी वक्फ बोर्डाकडून ट्रस्ट स्थापन करण्याची तयारी करण्यात येत आहे. लकवरच ट्रस्टची घोषणा होऊ शकते. बाबरी प्रकरणातील अन्य पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी या जमिनीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

अन्सारी यांच्यानुसार ट्रस्ट अद्याप स्थापन झाले नाही. सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष कोणाचाही फोन घेत नाहीत. आम्ही अयोध्येत जमिनीची मागणी केली होती. जमीन मिळाल्यानंतर तिथे शाळा, रुग्णालय आणि धर्मशाळा उभारण्याचा आमचा मानस होता, असं अन्सारी यांनी सांगितले.

मुस्लिमांना देण्यात आलेली जमीन कृषीची आहे. शेतीसाठी ही जमीन योग्य आहे. त्यामुळे या जमिनीवर शेती करावी आणि त्यातून निघालेले अन्नधान्य गरिबांना वाटून द्यावे, अशी मागणी अन्सारी यांनी व्यक्त केली आहे. आमचं मान्य केल तर ठिक अन्यथा आम्ही ट्रस्टला विरोध करणार असल्याचे इकबाल अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे.