शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

“अग्निपथ योजनेला विरोध करणारे देशद्रोही, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे चुकीचे”: बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 00:02 IST

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन करणारे महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या देशाचे नागरिक असू शकत नाहीत, अशी टीका बाबा रामदेव यांनी केली.

अहमदाबाद: केंद्रातील मोदी सरकारने घोषित केलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशातील अनेक ठिकाणांहून प्रचंड विरोध करण्यात येत आहे. या योजनेला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो आंदोलकांनी देशाच्या मालमत्तेचे प्रचंड मोठे नुकसान केल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेला लष्करासह अनेकांचा पाठिंबाही मिळत आहे. यातच आता योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी अग्निपथ योजनेला पाठिंबा दर्शवला असून, या योजनेला विरोध करणारे राष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका बाबा रामदेव यांनी केली आहे. ते गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. 

अग्निपथ योजनेविरोधात आंदोलकांनी चार दिवसांत ७०० कोटींची संपत्ती भस्मसात केल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय रेल्वेचे ६० डबे, ११ इंजिनांना आगी लावण्यात आल्या. याबरोबरच अनेक मालमत्तांनाही आगी लावल्या. जेवढ्या किमतीची मालमत्ता जाळली, त्यात बिहारला १० नवीन रेल्वे मिळू शकल्या असत्या, असे सांगितले जात आहे. देशाच्या संपत्तीचे होणाऱ्या नुकसानीबाबत बाबा रामदेव यांनी खेद व्यक्त केला आहे. 

अग्निपथ योजनेला विरोध करणारे राष्ट्रद्रोही

केंद्रातील मोदी सरकारच्या या योजनेचे समर्थन करताना बाबा रामदेव म्हणाले की, असे लोक महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या देशाचे नागरिक नाहीत. ते देशद्रोही आहेत, कारण ते आमच्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करत आहेत. अग्निवीर तयार करण्याची योजना सरकारने विचारपूर्वक तयार केली आहे. याचा फायदा लष्कर आणि देशाला होईल. या योजनेला विरोध का होत आहे, हे समजत नाही. हिंसाचार आणि निदर्शने तातडीने थांबवायला हवीत, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. 

नरेंद्र मोदी संघर्षातून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेली व्यक्त

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असतील तर ते श्रीमंत कुटुंबातील होते म्हणून नाही. संघर्षातून त्यांनी हे स्थान मिळवले. एकेकाळी दिल्लीच्या (मनमोहन सिंग) सरकारने त्यांना मोठ्या अडचणीत टाकण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, त्यांच्या धाडसापुढे सरकारला झुकावे लागले, असे बाबा रामदेव यांनी नमूद केले. दुसरीकडे, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी विधानावर बोलताना, त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते. कोणत्याही धर्मावर टीका करणे चुकीचे आहे. पण आपल्या पूर्वजांवर टीका करण्यात आली असती, तर एवढा विरोध झाला नसता, असे सांगत, संपूर्ण जग प्रेषितांच्या समर्थनार्थ उभे राहिले. नुपूर जे बोलल होत्या, ती आवेशात केलेले विधान होते. दुसर्‍या प्रवक्त्याच्या आरोपाला त्या उत्तर देत होत्या, असे सांगत बाबा रामदेव यांनी नुपूर शर्मा यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाBaba Ramdevरामदेव बाबा