शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

एकाच मोबाईल नंबरवरून ७.५ लाख रजिस्ट्रेशन, मृत व्यक्ती घेतायेत आयुष्मान योजनेचा लाभ, कॅगच्या अहवालात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:45 IST

कॅगने आपल्या अहवालात सांगितले आहे की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुमारे ७.५ लाख लोकांनी फक्त एका फोन नंबरवर रजिस्ट्रेशन केले आहे.

नवी दिल्ली : भारत सरकारच्या 'आयुष्मान भारत योजने' या आरोग्य योजनेतील प्रमुख त्रुटी समोर आल्या आहेत. सरकारी खर्चाचा हिशोब करणाऱ्या 'भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक' (कॅग) संस्थेने या योजनेतील अनियमितता समोर आणला आहे. कॅगने आपल्या अहवालात सांगितले आहे की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुमारे ७.५ लाख लोकांनी फक्त एका फोन नंबरवर रजिस्ट्रेशन केले आहे. याशिवाय, आणखी एक फोन नंबर आहे, ज्यावर १.३९ लाख रजिस्ट्रेशन झाले आहे.

या योजनेंतर्गत अशा अनेक लोकांचे रजिस्ट्रेशन झाले आहे, जे रजिस्ट्रेशनसाठी पात्र नाहीत, असेही अहवालात समोर आले आहे. या योजनेचा लाभही या लोकांनी घेतला आहे. रजिस्ट्रेशनसाठी पात्र नसलेल्या लोकांनी २२ कोटी रुपयांचा फायदा घेतल्याचे कॅगच्या अहवालात सांगण्यात आले आहे. ज्या ७.५ लाख लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे रजिस्ट्रेशन ९९९९९९९९९९ या क्रमांकावरून करण्यात आली. कॅगशी संबंधित एक अहवाल मंगळवारी संसदेत ठेवण्यात आला, ज्यामध्ये ही माहिती मिळाली आहे.

एवढेच नाही तर आयुष्मान योजनेशी संबंधित रुग्णालयांच्या दर्जावरही या अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. काही राज्यांमध्ये लाभार्थ्यांकडून वेगळे पैसेही गोळा करण्यात आल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. २०१७ ते २०२१ या काळात केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत २१०३ लाभार्थींचा मृत्यू झाला होता, मात्र तरीही त्यांना योजनेचा लाभ मिळत होता. छत्तीसगड, हरयाणा, झारखंड, केरळ आणि मध्य प्रदेश ही अशी राज्ये आहेत, जिथे अशा प्रकरणांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे.

काय आहे आयुष्मान योजना?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ रोजी झारखंडची राजधानी रांची येथे आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला होता. आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत १२ कोटी गरीब कुटुंबे येतात, ज्यांची लोकसंख्या सुमारे ५५ कोटी आहे. अशा प्रकारे आयुष्मान योजनेत देशाच्या ४० टक्के लोकसंख्येचा समावेश होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सayushman bharatआयुष्मान भारत