शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

एकाच मोबाईल नंबरवरून ७.५ लाख रजिस्ट्रेशन, मृत व्यक्ती घेतायेत आयुष्मान योजनेचा लाभ, कॅगच्या अहवालात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:45 IST

कॅगने आपल्या अहवालात सांगितले आहे की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुमारे ७.५ लाख लोकांनी फक्त एका फोन नंबरवर रजिस्ट्रेशन केले आहे.

नवी दिल्ली : भारत सरकारच्या 'आयुष्मान भारत योजने' या आरोग्य योजनेतील प्रमुख त्रुटी समोर आल्या आहेत. सरकारी खर्चाचा हिशोब करणाऱ्या 'भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक' (कॅग) संस्थेने या योजनेतील अनियमितता समोर आणला आहे. कॅगने आपल्या अहवालात सांगितले आहे की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुमारे ७.५ लाख लोकांनी फक्त एका फोन नंबरवर रजिस्ट्रेशन केले आहे. याशिवाय, आणखी एक फोन नंबर आहे, ज्यावर १.३९ लाख रजिस्ट्रेशन झाले आहे.

या योजनेंतर्गत अशा अनेक लोकांचे रजिस्ट्रेशन झाले आहे, जे रजिस्ट्रेशनसाठी पात्र नाहीत, असेही अहवालात समोर आले आहे. या योजनेचा लाभही या लोकांनी घेतला आहे. रजिस्ट्रेशनसाठी पात्र नसलेल्या लोकांनी २२ कोटी रुपयांचा फायदा घेतल्याचे कॅगच्या अहवालात सांगण्यात आले आहे. ज्या ७.५ लाख लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे रजिस्ट्रेशन ९९९९९९९९९९ या क्रमांकावरून करण्यात आली. कॅगशी संबंधित एक अहवाल मंगळवारी संसदेत ठेवण्यात आला, ज्यामध्ये ही माहिती मिळाली आहे.

एवढेच नाही तर आयुष्मान योजनेशी संबंधित रुग्णालयांच्या दर्जावरही या अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. काही राज्यांमध्ये लाभार्थ्यांकडून वेगळे पैसेही गोळा करण्यात आल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. २०१७ ते २०२१ या काळात केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत २१०३ लाभार्थींचा मृत्यू झाला होता, मात्र तरीही त्यांना योजनेचा लाभ मिळत होता. छत्तीसगड, हरयाणा, झारखंड, केरळ आणि मध्य प्रदेश ही अशी राज्ये आहेत, जिथे अशा प्रकरणांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे.

काय आहे आयुष्मान योजना?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ रोजी झारखंडची राजधानी रांची येथे आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला होता. आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत १२ कोटी गरीब कुटुंबे येतात, ज्यांची लोकसंख्या सुमारे ५५ कोटी आहे. अशा प्रकारे आयुष्मान योजनेत देशाच्या ४० टक्के लोकसंख्येचा समावेश होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सayushman bharatआयुष्मान भारत