शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

धार्मिक श्रद्धा बाजूला ठेवून अयोध्या वादाची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 03:48 IST

अयोध्येतील बाबरी मशीद-रामजन्मभूमीच्या २.७७ एकर जमिनीच्या मालकीसंबंधीच्या अपिलांवरील सुनावणी निव्वळ जमिनीच्या मालकीसंबंधीच्या नेहमीच्या दाव्याप्रमाणे केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशीद-रामजन्मभूमीच्या २.७७ एकर जमिनीच्या मालकीसंबंधीच्या अपिलांवरील सुनावणी निव्वळ जमिनीच्या मालकीसंबंधीच्या नेहमीच्या दाव्याप्रमाणे केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट  केले. म्हणजेच या सुनावणीत धार्मिक श्रद्धा किंवा न्यायालयाबाहेर शतकानुशतके सुरू असलेला वाद या गोष्टींना थारा असणार नाही, असे न्यायालयाने अप्रत्यक्षपणे सुचविले.या वादग्रस्त जागेच्या मालकीसंबंधी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्धची एकूण १४ अपिले सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा. न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्यापुढे आली. प्रकरण पुकारले जाताच सरन्यायाधीशांनी वरीलप्रमाणे स्पष्टिकरण करून सांगितले की, अलाहाबाद उच्च न्यायालयापुढील मूळ पक्षकारांचे (सुन्नी केंद्रीय वक्फ बोर्ड, भगवान रामलल्ला व निर्मोही आखाडा) म्हणणे आम्ही आधी ऐकून घेऊ. त्यानंतर या सुनावणीत सहभागी होण्यासाठी केलेल्या इतर अर्जांचा परामर्श घेतला जाईल.या दाव्यात मूळ दिवाणी न्यायालयात व उच्च न्यायालयात सादर झालेली कागदपत्रे व नोंदविले गेलेले साक्षीपुरावे यांचे इंग्रजी भाषांतर अद्याप पूर्ण झालेले नसल्याने खंडपीठाने ते काम पूर्ण करण्यास पक्षकारांना दोन आठवड्यांचा वेळ दिला आणि पुढील सुनावणी१४ मार्च रोजी ठेवली. या प्रकरणातील नऊ हजार पानांची कागदपत्रे वसुमारे ९० हजार पानांचे साक्षीपुरावे इंग्रजी व हिंदीखेरीज पाली, फारसी, अरबी आणि संस्कृत अशा विविध भाषांमध्ये आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे.या अपिलांवरील सुनावणी २०१९ च्या निवडणुका झाल्यानंतर घ्यावी, ही काही पक्षकारांनी केलेली मागणी न्यायालयाने गेल्या तारखेलाच अमान्य केली होती. आताही सर्व प्राथमिक औपचारिकता पूर्ण झाल्या तरी सुनावणी रोज होणार नाही, असेही खंडपीठाने सांगितले. रोज सुनावणी घेऊ असे आम्ही आधीही म्हटले नव्हते, असे न्यायमूर्ती म्हणाले.अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर केलेली हीअपिले सर्वोच्च न्यायालयातगेली सात वर्षे प्रलंबित आहेत. ती तातडीने निकाली निघतील, असे दिसत नाही.>जमिनीची तिहेरी वाटणीबाबरी मशीद कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी उद््ध्वस्त केल्याने आज या जमिनीच्या मालकीसंबंधीचा न्यायालयीन वाद ५० वर्षांहून अधिक जुना आहे. यात स्वत: प्रभू रामचंद्रही एक पक्षकार अहे. त्यातील अपिलांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०११ मध्ये २ : १ अशा बहुमताने निकाल दिला व वादग्रस्त २.७७ एकर जमिनीची तीन भागांत वाटणी करण्याचा आदेश दिला. जेथे भगवान रामाची मूर्ती विराजमान आहे, तो भाग रामलल्लाला, सीता रसोई व राम चबुतºयाचा भाग निर्मोही आखाड्याला व बाकीचा भाग सुन्नी वक्फ बोर्डाला, अशी ही वाटणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने या वाटणीला अंतरिम स्थगिती दिली आहे.> १४ अपिलेव अन्य अर्जमूळ दाव्यातील चार पक्षकारांनी केलेली एकूण १४ अपिले सर्वोच्च न्यायालयापुढे आहेत. जे मूळ पक्षकार नव्हते अशाकाही व्यक्ती व संस्थांनीही सुनावणीत सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत.त्यात भाजपाचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी व उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्ड यांचे अर्ज लक्षणीय आहेत. दोघांनीही वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधावे व मशीद अन्यत्र हलवावी, असा तोडगा सुचविला आहे. अर्थात या त्रयस्थांच्या अर्जांची कितपत दखल घ्यायची ही न्यायालयाने ठरावायचे आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय