शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 10:34 AM

पित्रोडांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता

नवी दिल्ली: काही जण येऊन हल्ले करतात, त्यासाठी संपूर्ण देशाला दोषी धरणार का?, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते सॅम पित्रोडांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. पुलवामा हल्ल्यावर भाष्य करताना पित्रोडांनी हा सवाल उपस्थित केला. यामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. त्यावेळी आम्हीदेखील विमानं पाठवू शकत होतो. मात्र असं करणं योग्य नाही. तुम्ही अशाप्रकारे वागू शकत नाही, अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी अप्रत्यक्षपणे एअर स्ट्राइकवर भाष्य केलं.

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला एअर स्ट्राइक यावर सॅम पित्रोडांनी भाष्य केलं. 'मला हल्ल्यांविषयी फारसं माहीत नाही. पण असे हल्ले होतच असतात. मुंबईवरदेखील हल्ला झाला होता. त्यावेळी आम्हीदेखील विमानं पाठवू शकलो असतो. मात्र ते योग्य नाही. तुम्ही असं वागू शकत नाही, असं मला वाटतं,' अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी पुलवामा हल्ला आणि हवाई दलाच्या हल्ल्यावर भाष्य केलं. काँग्रेसचे परदेश प्रमुख असलेले पित्रोडा राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात.

पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना त्यांनी 26/11 हल्ल्यावरही भाष्य केलं. 'आठजण आले आणि त्यांनी काहीतरी केलं. त्यासाठी तुम्ही देशाला (पाकिस्तानला) जबाबदार धरू शकत नाही. त्या देशातले काहीजण येऊन हल्ला करतात, त्यासाठी त्यांच्या देशातील प्रत्येक नागरिकाला दोषी धरता येणार नाही. यावर माझा विश्वास नाही,' असं पित्रोडा म्हणाले. हवाई दलाच्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती सरकारनं द्यायला हवी, असं पित्रोडा म्हणाले. 'आपण नेमका कुठे हल्ला केला, हे समजायला हवं. आपण खरंच 300 जणांचा खात्मा केला का?,' असा सवाल त्यांनी विचारला. 'तुम्ही 300 जण मारले असतील, तर आपल्याला ते कळायला हवं. सर्व भारतीयांना याची माहिती द्यायला हवी. हवाई दलाच्या हल्ल्याच कोणीच मारलं गेलं नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमं करतात. त्याबद्दल एक भारतीय म्हणून मला वाईट वाटतं,' असंदेखील ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRahul Gandhiराहुल गांधीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानcongressकाँग्रेसindian air forceभारतीय हवाई दलterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला