शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बुलेट आणि वॉलेट दोन्हींच्या माध्यमातून चीनवर करावा लागेल हल्ला, सोनम वांगचूक यांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 5:10 PM

शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सोनम वांगचूक यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देचीनने त्यांच्या देशांतर्गत समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भारतासोबत तणाव निर्माण करण्याची रणनीती अवलंबलीचीनच्या या कारस्थानाला आपण बुलेट आणि वॉलेट अशा दोन माध्यमातून प्रत्युत्तर दिले पाहिजेआम्ही चीनकडून मोत्यांपासून ते करड्यांपर्यंत सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे सामान खरेदी करतो. त्यानंतर हाच पैसा सीमेवर हत्यार आणि बंदुकांच्या माध्यमातून आपल्याच जवानांच्या मृत्यूचे कारण बनू शकतो

लेह (लडाख) - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव जैसे थे आहे. चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आल्याने देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, लडाखमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेल्या सोनम वांगचुक यांनीसुद्धा चीनच्या दगाबाजीला भारताने धडा शिकवला पाहिले, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चीनने त्यांच्या देशांतर्गत समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतासोबत तणाव निर्माण करण्याची रणनीती अवलंबली आहे. चीनच्या या कारस्थानाला आपण बुलेट आणि वॉलेट अशा दोन माध्यमातून प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे मत सोनम वांगचूक यांनी व्यक्त केले आहे.  

शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सोनम वांगचूक यांनी या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनच्या लष्करामध्ये निर्माण झालेला तणाव हा चीनने जाणूनबुजून निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बॉयकॉट मेड इन चायना अभियानाची सुरुवात करताना त्यांनी चीनला आर्थिक मोर्चावरही घेरण्याचे आवाहन केले आहे.  

आम्ही चीनकडून मोत्यांपासून ते करड्यांपर्यंत सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे सामान खरेदी करतो. त्यानंतर हाच पैसा सीमेवर हत्यार आणि बंदुकांच्या माध्यमातून आपल्याच जवानांच्या मृत्यूचे कारण बनू शकतो. तसेच चीन केवळ भारतासोबतच तणाव निर्माण करत नाही आहे तर दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, तैवान आणि आता हाँगकाँग या देशांचीही कुरापत काढत आहे, असे वांगचूक यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

 चीनमधील १४० कोटी जनता मानवाधिकांरांपासून वंचित आहे. त्यांच्याकडून वेठबिगारांसारखे काम करवून घेतले जाते. चीनमध्ये गेल्या काही काळापासून बेरोजगारी वेगाने वाढत आहे. त्यामुळे चिनी सैन्याला आपल्या जनतेमध्ये नाराजी आणि बंडखोरी निर्माण होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे या सर्वांवरून देशवासियांचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुरापती काढल्या जात आहेत, असे वांगचूक म्हणाले.   

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन