शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बुलेट आणि वॉलेट दोन्हींच्या माध्यमातून चीनवर करावा लागेल हल्ला, सोनम वांगचूक यांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 17:14 IST

शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सोनम वांगचूक यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देचीनने त्यांच्या देशांतर्गत समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भारतासोबत तणाव निर्माण करण्याची रणनीती अवलंबलीचीनच्या या कारस्थानाला आपण बुलेट आणि वॉलेट अशा दोन माध्यमातून प्रत्युत्तर दिले पाहिजेआम्ही चीनकडून मोत्यांपासून ते करड्यांपर्यंत सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे सामान खरेदी करतो. त्यानंतर हाच पैसा सीमेवर हत्यार आणि बंदुकांच्या माध्यमातून आपल्याच जवानांच्या मृत्यूचे कारण बनू शकतो

लेह (लडाख) - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव जैसे थे आहे. चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आल्याने देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, लडाखमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेल्या सोनम वांगचुक यांनीसुद्धा चीनच्या दगाबाजीला भारताने धडा शिकवला पाहिले, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चीनने त्यांच्या देशांतर्गत समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतासोबत तणाव निर्माण करण्याची रणनीती अवलंबली आहे. चीनच्या या कारस्थानाला आपण बुलेट आणि वॉलेट अशा दोन माध्यमातून प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे मत सोनम वांगचूक यांनी व्यक्त केले आहे.  

शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सोनम वांगचूक यांनी या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनच्या लष्करामध्ये निर्माण झालेला तणाव हा चीनने जाणूनबुजून निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बॉयकॉट मेड इन चायना अभियानाची सुरुवात करताना त्यांनी चीनला आर्थिक मोर्चावरही घेरण्याचे आवाहन केले आहे.  

आम्ही चीनकडून मोत्यांपासून ते करड्यांपर्यंत सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे सामान खरेदी करतो. त्यानंतर हाच पैसा सीमेवर हत्यार आणि बंदुकांच्या माध्यमातून आपल्याच जवानांच्या मृत्यूचे कारण बनू शकतो. तसेच चीन केवळ भारतासोबतच तणाव निर्माण करत नाही आहे तर दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, तैवान आणि आता हाँगकाँग या देशांचीही कुरापत काढत आहे, असे वांगचूक यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

 चीनमधील १४० कोटी जनता मानवाधिकांरांपासून वंचित आहे. त्यांच्याकडून वेठबिगारांसारखे काम करवून घेतले जाते. चीनमध्ये गेल्या काही काळापासून बेरोजगारी वेगाने वाढत आहे. त्यामुळे चिनी सैन्याला आपल्या जनतेमध्ये नाराजी आणि बंडखोरी निर्माण होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे या सर्वांवरून देशवासियांचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुरापती काढल्या जात आहेत, असे वांगचूक म्हणाले.   

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन