शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

बुलेट आणि वॉलेट दोन्हींच्या माध्यमातून चीनवर करावा लागेल हल्ला, सोनम वांगचूक यांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 17:14 IST

शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सोनम वांगचूक यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देचीनने त्यांच्या देशांतर्गत समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भारतासोबत तणाव निर्माण करण्याची रणनीती अवलंबलीचीनच्या या कारस्थानाला आपण बुलेट आणि वॉलेट अशा दोन माध्यमातून प्रत्युत्तर दिले पाहिजेआम्ही चीनकडून मोत्यांपासून ते करड्यांपर्यंत सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे सामान खरेदी करतो. त्यानंतर हाच पैसा सीमेवर हत्यार आणि बंदुकांच्या माध्यमातून आपल्याच जवानांच्या मृत्यूचे कारण बनू शकतो

लेह (लडाख) - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव जैसे थे आहे. चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आल्याने देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, लडाखमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेल्या सोनम वांगचुक यांनीसुद्धा चीनच्या दगाबाजीला भारताने धडा शिकवला पाहिले, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चीनने त्यांच्या देशांतर्गत समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतासोबत तणाव निर्माण करण्याची रणनीती अवलंबली आहे. चीनच्या या कारस्थानाला आपण बुलेट आणि वॉलेट अशा दोन माध्यमातून प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे मत सोनम वांगचूक यांनी व्यक्त केले आहे.  

शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सोनम वांगचूक यांनी या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनच्या लष्करामध्ये निर्माण झालेला तणाव हा चीनने जाणूनबुजून निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बॉयकॉट मेड इन चायना अभियानाची सुरुवात करताना त्यांनी चीनला आर्थिक मोर्चावरही घेरण्याचे आवाहन केले आहे.  

आम्ही चीनकडून मोत्यांपासून ते करड्यांपर्यंत सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे सामान खरेदी करतो. त्यानंतर हाच पैसा सीमेवर हत्यार आणि बंदुकांच्या माध्यमातून आपल्याच जवानांच्या मृत्यूचे कारण बनू शकतो. तसेच चीन केवळ भारतासोबतच तणाव निर्माण करत नाही आहे तर दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, तैवान आणि आता हाँगकाँग या देशांचीही कुरापत काढत आहे, असे वांगचूक यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

 चीनमधील १४० कोटी जनता मानवाधिकांरांपासून वंचित आहे. त्यांच्याकडून वेठबिगारांसारखे काम करवून घेतले जाते. चीनमध्ये गेल्या काही काळापासून बेरोजगारी वेगाने वाढत आहे. त्यामुळे चिनी सैन्याला आपल्या जनतेमध्ये नाराजी आणि बंडखोरी निर्माण होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे या सर्वांवरून देशवासियांचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुरापती काढल्या जात आहेत, असे वांगचूक म्हणाले.   

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन