शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

पुलवामाचा बदला घेत बालाकोटमध्ये केला हल्ला; विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमाला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 06:55 IST

दोन वर्षे पूर्ण : विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमाला सलाम

नवी दिल्ली : काश्मिरात पुलवामामध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट होती. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारताने हल्ला करून याचा बदला घेतला. त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. 

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण ठिकाणावर भारताने हल्ला केला होता. भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या अतिरेक्यांना याच ठिकाणी मारण्यात आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय हवाई दलाचे कौतुक करत स्पष्ट केले होते की, हा हवाई हल्ला म्हणजे भारतावर हल्ला करण्याची हिंमत करणाऱ्यांना इशारा आहे. 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैशच्या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसविले होते. पुलवामातील या घटनेत ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने एलओसीवरून पाकिस्तानच्या बाजूने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ३५० हून अधिक अतिरेकी मारले गेल्याचे सांगण्यात येते. मृतात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहर हाही होता. 

भारतीय हवाई दलाचे जोरदार प्रत्युत्तर

या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत जेट पाठविले. त्याला भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर दिले आणि हे विमाने परतवून लावले. या घटनाक्रमात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे जेट पीओकेमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. ६० तासांनंतर अभिनंदन यांची पाकिस्तानने सुटका केली. २८ फेब्रुवारी रोजी अभिनंदन यांची सुटका झाली. अभिनंदन यांना ऑगस्ट २०१९ मध्ये वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारत