शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
2
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
3
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
4
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
5
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
6
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
7
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
8
चांदीचा धमाका! एका आठवड्यात १५ हजार रुपयांची वाढ; सोने विक्रमी पातळीच्या दिशेने, ताजे दर काय?
9
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
10
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
11
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
12
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
13
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
14
Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर
15
Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा
16
भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
17
Nashik Municipal Election 2026 : २०१२ मध्ये ब्ल्यू प्रिंट; २०१७ मध्ये दत्तक, यंदा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांकडे लक्ष
18
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
19
Nashik Municipal Election 2026 : अखेरच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागासाठी भाजपकडून आता स्वतंत्र सूक्ष्म नियोजन
20
कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेस-राष्ट्रवादी अन् शिवसेनेचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही दलितांवर अत्याचार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 18:01 IST

आठवलेंनी विविध विषयांवर आणि दलितांवरील अत्याचारावर आपली भूमिका मांडली. ''नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जेवढ्या मोठ्या संख्येनं लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तो केवळ ब्राह्मणांच्या मतांवर शक्य नाही

ठळक मुद्दे ''नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जेवढ्या मोठ्या संख्येनं लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तो केवळ ब्राह्मणांच्या मतांवर शक्य नाही. भाजपला सगळ्यांनी मतं दिलीत. तो दलित पक्षही आहे

मुंबई - केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी 'दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल बोलताना भाजपाला दोष देणं योग्य नसल्याचं म्हटलंय. आजचा दलित चांगले कपडे परिधान करू लागलाय. तो आज कुणालाही वाकून नमस्कार करत नाही. याच रागातून त्यांच्याविरुद्ध अत्याचाराच्या घटना वाढत आहेत', असं मत रामदास आठवले केलं आहे.  'दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल भाजप सरकारला दोष देणं योग्य नाही. यासाठी समाजाची धारणा दोषी आहे', असेही आठवलेंनी स्पष्ट केले. काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादीचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही दलितांच्या अत्याचारात वाढ झाल्याचे 'नवभारत टाईम्स'च्या एका मुलाखतीत बोलताना आठवलेंनी म्हटले. 

आठवलेंनी विविध विषयांवर आणि दलितांवरील अत्याचारावर आपली भूमिका मांडली. ''नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जेवढ्या मोठ्या संख्येनं लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तो केवळ ब्राह्मणांच्या मतांवर शक्य नाही. भाजपला सगळ्यांनी मतं दिलीत. तो दलित पक्षही आहे, मागासवर्गीयांचा आणि अल्पसंख्यांकाचाही आहे' असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. याच मुलाखतीत बोलताना दलित अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याचं रामदास आठवले यांनी नाकारलं नसलं तरी यामागे सामाजिक भेदभाव कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलंय. 

आजचा दलित चांगले कपडे परिधान करू लागलाय. तो आज कुणालाही वाकून नमस्कार करत नाही. याच रागातून त्यांच्याविरुद्ध अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दलित अत्याचाराच्या घटनांत नक्कीच वाढ झालीय पण ती केवळ भाजपशासित राज्यांत नाही तर काँग्रेसचं सरकार असलेल्या राजस्थानात आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही या घटना वाढल्यात. कायदा व सुव्यवस्था हा राज्य सरकारांचा विषय आहे. सोबतच समाजालाही बदलावं लागेल. भाजपमुळे हे होतंय असं म्हणणं चुकीचं असल्याचं सांगत आठवलेंनी भाजपाची पाठराखण केली आहे.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेDalit assaultदलितांना मारहाणShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस