शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

अखेर दोन दशकांनी अटलबिहारी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 11:03 IST

लोकसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावावेळी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारला बहुमतासाठी 1 मत कमी मिळाले होते.

जवळपास दोन दशकांपूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेली भविष्यवाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या विजयाने खरी ठरविली आहे. 1999 मध्ये केवळ 1 मतामुळे अटलबिहारी वाजपेयींचे सरकार पडले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते. 

लोकसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावावेळी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारला बहुमतासाठी 1 मत कमी मिळाले होते. यामुळे त्यांना सत्ता सोडावी लागली होती. यावेळी वाजपेयी राजीनामा देत असताना विरोधकांनी त्यांनी खिल्ली उडविली होती. तसेच जोरजोरात बेंच वाजवत होते. यावेळी अटलबिहारी वाजपेयींना विरोधकांना त्यांच्या शैलीत सुनावले होते. 

आज तुम्ही आमची उपहासात्मक खिल्ली उडवत आहात, पण एक दिवस असा येईल की लोक तुमची खिल्ली उडवतील, असे त्यांनी विरोधकांना सांगितले होते. वाजपेयींचे हे भाषण अनेक बाबतीत आठवणीत राहिले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या घवघवीत यशामुळे वाजपेयींचे ते भाषण पुन्हा चर्चेत आले आहे. 

याच भाषणात वाजपेयींनी सपूर्ण देशात कमळ उगवणार असल्याचीही भविष्यवाणी केली होती. या विजयाने त्यांच्या दोन्ही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. मात्र, यासाठी दोन दशकांचा वेळ जावा लागला. 

मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने 353 जागा जिंकल्या आहेत. तसेच काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदापासून दलग दुसऱ्यांदा वंचित राहावे लागणार आहे. गेल्या वेळी विरोधी पक्षाचा नेत्याचा दर्जा देण्य़ासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले होते. मात्र, यंदाही काँग्रेसला ते मिळू शकणार नाही. तसेच या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याकडून हरले आहेत.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी