शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Atal Bihari Vajpayee: अन् वाजपेयींनी मला अध्यक्ष केलं, शरद पवारांनी सांगितला 'अटल किस्सा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 10:54 AM

Atal Bihari Vajpayee: सन 1996 साली वाजपेयींचे 13 दिवसांचे सरकार पडले. त्यावेळी मी काँग्रेसचा संसदीय नेता होतो. त्यामुळे मी संसदेत अविश्वास ठरावाच्याबाजूने आणि सरकारविरोधात भाषण केले. त्यावेळी, वाजपेयींनी

मुंबई - अटल बिहारी वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तीमत्व होते. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अटलजींबाबत एक गोष्ट नेहमीच सांगितली जाते ती म्हणजे, वाजपेयी विरोधकांचाही सन्मान ठेवत, विरोधकांचेही म्हणणे पूर्ण ऐकून घेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीही वाजपेयींच्या या शैलीचे कौतूक करतानाचा एक किस्सा कथित केला आहे. 2002 च्या गुजरात भूंकपानंतर आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी अटलजींच्याच सरकारने माझी निवड केल्याची पवार यांनी म्हटले.   

भरल्या ताटावरुन अटलजी उठले अन् लखनौ विमान अपहरणातील 48 भारतीयांचा जीव वाचला

पुलोदच्या काळात शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याकाळात जनता पक्षाचाही पवारांना पाठिंबा होता. त्यामुळे पवार यांचे राजकीय कामकाजातून वाजपेयींशी संबंध आले, ते पुढे अधिकच घट्ट होत गेले. पवार यांनी वाजपेयींच्या सुसंस्कृत आणि सभ्यतेच्या राजकारणाबाबत बोलताना एक आठवण सांगितली आहे. सन 1996 साली वाजपेयींचे 13 दिवसांचे सरकार पडले. त्यावेळी मी काँग्रेसचा संसदीय नेता होतो. त्यामुळे मी संसदेत अविश्वास ठरावाच्याबाजूने आणि सरकारविरोधात भाषण केले. त्यावेळी, वाजपेयींनी माझे भाषण शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मात्र, त्या रात्री मला फोन करुन माझ्याशी बोलणे केले. मी संसदेत केलेल्या भाषणाबद्दल अटलजींनी माझे कौतूक केले, असे आठवण पवार यांनी सांगितली आहे.

Atal Bihari Vajpayee : दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आज शाळा-कॉलेज राहणार बंद

तसेच सन 2002 मध्ये गुजरातमध्ये मोठा भूकंप आला होता, त्यात मोठी हानी झाली होती. त्यावेळी केंद्रात भाजप आघाडीचे सरकार होते. महाराष्ट्रातील लातूरच्या भूंकपातील पुनवर्सनाचा मला अनुभव होता. त्यामुळे मी स्वत: अटलजींना गुजरातमध्ये पुनवर्सनासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी, त्यांच्या काळात आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करुन त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. विरोधी पक्षाच्या चांगल्या सूचनाही ते नेहमी आदराने आणि सन्माने स्विकारायचे असेही पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPresidentराष्ट्राध्यक्षBJPभाजपा