शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Atal Bihari Vajpayee : आणीबाणी संपल्यावर वाजपेयींच्या 'या' तीन ओळी ऐकून भारावली होती जनता!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 5:41 PM

Atal Bihari Vajpayee : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे आणि त्यात कवितांचा ते करत असलेला चपखल वापर नेहमीच चर्चेचा विषय होता.

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे आणि त्यात कवितांचा ते करत असलेला चपखल वापर नेहमीच चर्चेचा विषय होता. अटलबिहारी वाजपेयी आज आपल्यात नाहीयेत. अनेक गंभीर आजारांशी अनेक वर्ष लढा देत अखेर त्यांची प्राणज्योत आज मावळली. त्यांच्या अनेक गाजलेल्या भाषणांपैकी एक भाषण म्हणजे आणीबाणी संपल्यानंतर त्यांनी रामलीला मैदानात केलेलं भाषण. 

वाजपेयी यांना खऱ्या अर्थाने देशाचे लोकनेता म्हणता येईल. ते त्या मोजक्याच नेत्यांपैकी एक होते ज्यांना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली जात होते. हिंदी भाषेवरील त्यांच्या प्रभूत्वामुले ते त्यांच्या भाषणात अशा काही शब्दांचा प्रयोग करायचे की, त्यांचं भाषण ऐकणारी जनता भारावून जायची. विरोधीपक्ष नेता म्हणून केलेलं भाषण असो, संयुक्त राष्ट्र संघात केलेलं भाषण असो ते परिस्थितीनुसार आपल्या भाषणात शब्दांचा प्रयोग करायचे. 

१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती. विरोधी पक्षांनी याचा जोरदार विरोध केला होता. मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने इंदिरा गांधी यांना माघार घ्यावी लागली होती. आणि १९७७ मध्ये निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. आणीबाणी संपल्यावर दिल्लीतील रामलीला मैदानात एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये अटलबिहारी वाजपेयी होते. ते भाषण देण्यासाठी येताच उपस्थित हजारो लोकांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला होता. 

अटलबिहारी वाजपेयी यांनी गर्दीला शांत राहण्याचा इशारा केला. त्यानंतर आपल्या खास अंदाजात त्यांनी थोडा वेळ घेत ते म्हणाले 'बाद मुद्दत मिले हैं दिवाने'. यानंतर त्यांनी थोडा पॉझ घेतला आणि आपले डोळे काही वेळासाठी बंद केले. यावेळी रामलीला मैदानातील जनता जोरजोरात नारे लावू लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाजपेयी यांनी डोळे उघडून लोकांना शांत राहण्याचा इशारा केला. पुढे म्हणाले, 'कहने सुनने को बहुत हैं अफसाने'. हे ऐकल्यावर पुन्हा एकदा मैदानातील लोक जोरजोरात नारे देऊ लागले होते. पुढे वाजपेयी आपल्या ओळी पूर्ण करत म्हणाले की, 'खुली हवा में जरा सांस तो ले लें, कब तक रहेगी आजादी भला कौन जाने'.

या तीन ओळींमध्ये वाजपेयी यांनी आणीबाणी संपल्यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर जमलेल्या लोकांनी इतके नारे लावले की, वाजपेयी आणखी काही बोलण्याची गरजच पडली नाही. यावरुनच वाजपेयी कशाप्रकारे शब्दांचे जादुगर होते आणि त्यांना ऐकल्यावर लोक कसे वेडे होते हे यातून बघायला मिळतं.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपाNew Delhiनवी दिल्लीIndiaभारत