शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Assembly Election Results 2021: ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 21:52 IST

Assembly Election Results 2021: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत ही लढाई सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी यांची निवडणूक निकालानंतर प्रतिक्रियाजनतेचे आणि कार्यकर्त्यांचे मानले आभारमूल्य आणि आदर्शांची लढाई पुढेही सुरूच राहील - राहुल गांधी

नवी दिल्ली: देशभरातील पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, आणि पुदुच्चेरी येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकालांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमध्ये भाजपची कहीं खुशी कहीं गम, अशी अवस्था झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असला, तरी आसामचा गड आणि पुदुच्चेरीमध्ये मोठी आघाडी घेण्यात भाजपला यश आले आहे. मात्र, काँग्रेस पक्षाला सर्वच ठिकाणी पराभव पत्करावा लागल्याचे पाहायला मिळत आहे. यावर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत ही लढाई सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. (assembly election results 2021 congress rahul gandhi reacts on election result in five states)

देशातील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मागील विधानसभेच्या जागाही राखता आल्याचे पाहायला मिळाले नाही. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली असून, काँग्रेसचा झालेला पराभव स्वीकारला आहे. 

काय म्हणाले राहुल गांधी?

जनतेच्या निर्णयाचा स्वीकार करतो. निवडणूक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे लाखों आभार मानतो. तसेच काँग्रेसवर ज्यांनी विश्वास दाखवला, त्या सर्वांचेही आभार मानतो. मूल्य आणि आदर्शांची लढाई पुढेही सुरूच राहील. जय हिंद, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

अशा विजयाचा काहीच फायदा नाही

कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे. कोणीही जिंको. पण देशाचं प्रचंड नुकसान होत आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. 

योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

दरम्यान, भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी मतदान संपल्यानंतर आलेले एक्झिट पोल्सचे आकडे हेच दाखवत होते. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एकहाती लढत देत भाजपचे सत्ताबदलाचे मनसुबे धुळीस मिळवले. ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष सध्या २०० पेक्षा अधिक मतदारसंघांत आघाडीवर असल्यानं सर्व एक्झिट पोल्स चुकले आहेत. एकाही एक्झिट पोल्सनं ममतांच्या पक्षाला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील आणि भाजप १०० च्या खाली राहील असा अंदाज वर्तवलेला नव्हता.  

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Puducherry Assembly Elections 2021पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण