शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

"काँग्रेसला कुणीही माय-बाप उरला नाही, ती देशाला भविष्य देऊ शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 9:57 PM

कॉंग्रेस पूर्णपणे कोसळत आहे. मग मत काँग्रेसला द्या अथवा भाजपला, सरकार भाजपचेच बनते. कारण...

ठळक मुद्देकाँग्रेसमधील अनेक नेत्यांनी, आपल्याच पक्षाप्रति नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसची साथ सोडून भाजपत गेले आहेत.नुकतेच मध्य प्रदेशातही आमदारांनी राम-राम ठोकल्यानंतर काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. 

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या घसरगुंडीनंतर काँग्रेसला सातत्याने आरोपांचा सामना करावा लागत आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी घरचा आहेर दिल्यानंतर, आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "काँग्रेस देशाला भविष्य देऊ शकत नाही. काँग्रेसचा कुणीही माय-बाप उरला नाही. जनतेने काँग्रेस अथवा भाजप कुणालाही मत दिले, तरी सरकार भाजपचेच बनते. काँग्रेसचे आमदार नंतर वेगळे होऊन भाजपमध्ये जातात," असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिन्दुस्तान टाइम्स लिडरशिप समिट 2020मध्ये बोलत होते, ''कॉंग्रेस पूर्णपणे कोसळत आहे. मग मत काँग्रेसला द्या अथवा भाजपला, सरकार भाजपचेच बनते. काँग्रेसचे आमदार नंतर भाजपमध्ये जातात. काँग्रेस देशाचे भविष्य होऊ शकत नाही,'' असे केजरीवाल म्हणाले. 

देश पातळीवरील राजकारणात आम आदमी पार्टीच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता केजरीवाल म्हणाले, ''आमची भूमिका कशी असेल, हे वेळच ठरवेल. आम आदमी पार्टी एक छोटा पक्ष आहे. संघटनात्मक दृष्ट्या आमचा फारसा विस्तार नाही. मात्र, दिल्लीतील कामांमुळे संपूर्ण देश आम आदमी पार्टीकडे आदराने पाहतो. मला आशा आहे, की देशातील लोक नक्कीच पर्याय देतील.''

केजरीवालांच्या या वक्तव्यापूर्वी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी, आपल्याच पक्षाप्रति नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात आदी. ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि पोट निवडणुकीत काँग्रेसची पार घसरगुंडी उडाली. गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसची साथ सोडून भाजपत गेले आहेत. नुकतेच मध्य प्रदेशातही आमदारांनी राम-राम ठोकल्यानंतर काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीAam Admi partyआम आदमी पार्टी