शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

अधिकार आहेत म्हणून अटक करणे बेकायदा- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 05:34 IST

Supreme Court : एका प्रकरणात आरोपीने गुन्ह्यात सहकार्य केले. तपास पूर्ण झाला. दोषारोपपत्रही तयार झाले. मात्र, न्यायालयाने आरोपी हजर केल्याशिवाय दोषारोपपत्र स्वीकारण्यास नकार दिला.

- डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : कायद्यात अटकेची तरतूद आहे. आपल्याला अटकेचे अधिकार आहेत, म्हणून पोलिसांनी सर्वच गुन्ह्यांत आरोपींना अटक करणे आवश्यक नाही, असे स्पष्ट करीत व्यक्तिस्वातंत्र्य हा महत्त्वाचा घटनात्मक अधिकार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

एका प्रकरणात आरोपीने गुन्ह्यात सहकार्य केले. तपास पूर्ण झाला. दोषारोपपत्रही तयार झाले. मात्र, न्यायालयाने आरोपी हजर केल्याशिवाय दोषारोपपत्र स्वीकारण्यास नकार दिला. पोलिसांनी शेवटी अटक करून दोषारोपपत्र पाठविण्याची तयारी केली. आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मागितला; पण अर्ज फेटाळण्यात आला.

याविरुद्ध आरोपीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाने हे अपील मंजूर करताना आरोपीशिवाय दोषारोपपत्र न घेण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा व अटकपूर्व जामीन फेटाळण्याचा उच्च न्यायालयाचा, असे दोन्ही आदेश रद्द केले.

अटक केव्हा करावी ?१) जघन्य गुन्ह्यातील आरोपी असल्यास२) कोठडीत विचारपूस आवश्यक असेल तर३) साक्षीदारांवर दबाव निर्माण करण्याची शक्यता असेल तेंव्हा४) आरोपी फरार होण्याची शक्यता असल्यास

- आरोपीच्या अटकेचे अधिकार असणे व त्याचा न्याय्य प्रमाणात वापर करणे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.    रुटीन अटकेमुळे व्यक्तीच्या प्रतिष्ठा व आत्मसन्मानाची अपरिमित हानी.- दोषारोपपत्र स्वीकारण्यासाठी आरोपी हजर ठेवण्याची न्यायालयाची अट चुकीची. पोलीस अधिकाऱ्यांवर असे बंधन घालता येणार नाही.-  सर्वच दखलपात्र व अजामीन पात्र गुन्ह्यांत अटक करणे व न्यायालयात हजर करण्याची आवश्यकता नाही.  -न्या. संजय किशन कौल आणि हृषिकेश रॉय,     सर्वोच्च न्यायालय (एसएलपी (क्री.) ५४८२/२१)

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArrestअटकPoliceपोलिस