लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी घेतली राम मंत्राची दीक्षा; महाराजांनी दक्षिणा म्हणून मागितला PoK
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:54 IST2025-05-29T10:52:06+5:302025-05-29T10:54:15+5:30
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राम भद्राचार्य महाराजांकडून राम मंत्राची दीक्षा घेतली

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी घेतली राम मंत्राची दीक्षा; महाराजांनी दक्षिणा म्हणून मागितला PoK
Jagadguru Rambhadracharya Dakshina : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (Army Chief General Upendra Dwivedi) यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथील तुलसी पीठ आश्रमात जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्याकडून राम मंत्राची दीक्षा घेतली आहे. यादरम्यान रामभद्राचार्य यांनी त्यांच्याकडून दक्षिणा म्हणून पाकव्याप्त काश्मीरची मागणी केली.
जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी सांगितले की, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माझ्याकडून राम मंत्राची दीक्षा घेतली. मी त्यांना तोच राम मंत्र दिला, जो सीता मातेने भगवान हनुमानाला दिला होता. त्या राम मंत्रानंतर लंकेवर विजय मिळवता आला. मी उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून दक्षिणेत पीओकेची मागणी केली. लष्करप्रमुखांचा सन्मान करताना मला खूप अभिमान वाटला, अशी प्रतिक्रिया महाराजांनी व्यक्त केली.
#WATCH | Madhya Pradesh | On Chief of Army Staff General Upendra Dwivedi visiting his Ashram in Chitrakoot yesterday, Spiritual Leader Jagadguru Rambhadracharya says, "I gave him the same Diksha (initiation) with the Ram Mantra which Lord Hanuman had received from Maa Sita and… pic.twitter.com/C7Sc3sDTUb
— ANI (@ANI) May 29, 2025
लष्करप्रमुखांची ही भेट केवळ आध्यात्मिकच नव्हती, तर सामाजिक चिंतेशी संबंधित होती. त्यांनी सद्गुरु नेत्र रुग्णालयाची पाहणी केली आणि सद्गुरु सेवा संघ ट्रस्टने आयोजित केलेल्या सत्कार समारंभातही भाग घेतला. यादरम्यान पद्मश्री डॉ. बी. के. जैन यांनी त्यांचे स्वागत केले. जनरल द्विवेदी यांनी गुरु रामभद्राचार्य यांना स्मृतिचिन्ह अर्पण केले आणि त्यांच्या सेवाकार्याचे कौतुकही केले. त्यांना भारताच्या आध्यात्मिक आणि सामाजिक शक्तीचे प्रतीकही म्हटले.
लष्करप्रमुखांच्या आगमनापूर्वीच तुलसी पीठ परिसरात व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. आश्रमापासून मंदिरापर्यंत प्रत्येक वळणावर पोलिस आणि सुरक्षा दलांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्या आगमनाने केवळ आध्यात्मिक वातावरणालाच ऊर्जा मिळाली नाही, तर परिसरात देशभक्तीची भावनाही जागृत झाली, असे सांगितले जात आहे.