शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सशस्त्र दलांनी आव्हानांच्या मुकाबल्यासाठी राहावे सदैव दक्ष, राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 08:42 IST

Rajnath Singh: भारताच्या सशस्त्र दलांनी सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. मग तो अल्पकालीन संघर्ष असो की पाच वर्षापर्यंत चालणारे युद्ध. कारण सध्याच्या वातावरणात अनिश्चिततेचे प्रमाण खूप अधिक आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले.

महू - भारताच्या सशस्त्र दलांनी सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. मग तो अल्पकालीन संघर्ष असो की पाच वर्षापर्यंत चालणारे युद्ध. कारण सध्याच्या वातावरणात अनिश्चिततेचे प्रमाण खूप अधिक आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले.

महू येथे सुरू असलेल्या रणसंवाद या परिषदेत ते म्हणाले की, फक्त सैन्याची संख्या किंवा शस्त्रसाठ्याच्या बळावर आता युद्ध जिंकता येणार नाही. सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन आणि उपग्रह आधारित टेहळणी यासारख्या गोष्टी भविष्यातील युद्धांचे स्वरूप ठरवत आहेत.

आर्मी वॉर कॉलेजमध्ये झालेल्या या परिषदेच्या शेवटच्या दिवशी ते म्हणाले की. अचक लक्ष्य करणारी शस्त्रे रिअल टाइम गुप्तचर माहिती आणि डेटावर आधारित निर्णयप्रणाली ही आता कोणतेही युद्ध जिंकण्यासाठी मुख्य साधने ठरत आहेत.

आजच्या काळात युद्ध इतके अचानक आणि अनिश्चित वळण घेते की ते किती काळ चालेल, याचा अंदाज बांधणे फार कठीण झाले आहे. याचा अर्थ असा की जर युद्ध दोन महिने, चार महिने, एक वर्ष, दोन वर्षे किंवा पाच वर्षेही चालेल, तरी आपण त्यासाठी पूर्णतः सज्ज असले पाहिजे. (वत्तसंस्था)

युद्ध विस्तारले सायबर स्पेसपर्यंतसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आधुनिक युद्ध आता केवळ जमीन, समुद्र आणि आकाशापुरते मर्यादित राहिलेले नाही; ते आता अवकाश आणि सायबर स्पेसपर्यंत विस्तारले आहे.उपग्रह यंत्रणा, अँटी-सॅटेलाइट 3 शस्त्रे आणि स्पेस कमांड सेंटर्स ही नव्या सामर्थ्याची साधने आहेत. त्यामुळे आपल्याला केवळ संरक्षणात्मक तयारी पुरेशी ठरणार नाही, तर आक्रमक रणनीतीचीही गरज आहे. सध्या पारंपरिक युद्धपद्धतीची जागा तंत्रज्ञानावर आधारित ३ युद्धशैलीने घेतली आहे.

भारताला कोणावरही कब्जा करायचा नाहीराजनाथ सिंह म्हणाले की, जे राष्ट्र तंत्रज्ञान, रणनीती आणि परिस्थितीनुसार बदल स्वीकारण्याची क्षमता या तीन गोष्टींत पारंगत होईल तेच खऱ्या अर्थाने जागतिक शक्ती बनू शकेल. हा इतिहासाकडून शिकण्याचा आणि नवीन इतिहास घडवण्याचा क्षण आहे. भारताला कोणाच्याही प्रदेशावर कब्जा करायचा नाही; पण वेळप्रसंगी आम्ही भूभागाच्या रक्षणासाठी लक्ष्मणरेषा ओलांडून कारवाई करायलाही तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग