शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
4
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
5
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
6
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
7
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
8
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
9
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
10
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
11
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
12
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
13
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
14
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
15
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
16
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
17
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
18
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
19
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
20
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल

सशस्त्र दलांनी आव्हानांच्या मुकाबल्यासाठी राहावे सदैव दक्ष, राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 08:42 IST

Rajnath Singh: भारताच्या सशस्त्र दलांनी सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. मग तो अल्पकालीन संघर्ष असो की पाच वर्षापर्यंत चालणारे युद्ध. कारण सध्याच्या वातावरणात अनिश्चिततेचे प्रमाण खूप अधिक आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले.

महू - भारताच्या सशस्त्र दलांनी सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. मग तो अल्पकालीन संघर्ष असो की पाच वर्षापर्यंत चालणारे युद्ध. कारण सध्याच्या वातावरणात अनिश्चिततेचे प्रमाण खूप अधिक आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले.

महू येथे सुरू असलेल्या रणसंवाद या परिषदेत ते म्हणाले की, फक्त सैन्याची संख्या किंवा शस्त्रसाठ्याच्या बळावर आता युद्ध जिंकता येणार नाही. सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन आणि उपग्रह आधारित टेहळणी यासारख्या गोष्टी भविष्यातील युद्धांचे स्वरूप ठरवत आहेत.

आर्मी वॉर कॉलेजमध्ये झालेल्या या परिषदेच्या शेवटच्या दिवशी ते म्हणाले की. अचक लक्ष्य करणारी शस्त्रे रिअल टाइम गुप्तचर माहिती आणि डेटावर आधारित निर्णयप्रणाली ही आता कोणतेही युद्ध जिंकण्यासाठी मुख्य साधने ठरत आहेत.

आजच्या काळात युद्ध इतके अचानक आणि अनिश्चित वळण घेते की ते किती काळ चालेल, याचा अंदाज बांधणे फार कठीण झाले आहे. याचा अर्थ असा की जर युद्ध दोन महिने, चार महिने, एक वर्ष, दोन वर्षे किंवा पाच वर्षेही चालेल, तरी आपण त्यासाठी पूर्णतः सज्ज असले पाहिजे. (वत्तसंस्था)

युद्ध विस्तारले सायबर स्पेसपर्यंतसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आधुनिक युद्ध आता केवळ जमीन, समुद्र आणि आकाशापुरते मर्यादित राहिलेले नाही; ते आता अवकाश आणि सायबर स्पेसपर्यंत विस्तारले आहे.उपग्रह यंत्रणा, अँटी-सॅटेलाइट 3 शस्त्रे आणि स्पेस कमांड सेंटर्स ही नव्या सामर्थ्याची साधने आहेत. त्यामुळे आपल्याला केवळ संरक्षणात्मक तयारी पुरेशी ठरणार नाही, तर आक्रमक रणनीतीचीही गरज आहे. सध्या पारंपरिक युद्धपद्धतीची जागा तंत्रज्ञानावर आधारित ३ युद्धशैलीने घेतली आहे.

भारताला कोणावरही कब्जा करायचा नाहीराजनाथ सिंह म्हणाले की, जे राष्ट्र तंत्रज्ञान, रणनीती आणि परिस्थितीनुसार बदल स्वीकारण्याची क्षमता या तीन गोष्टींत पारंगत होईल तेच खऱ्या अर्थाने जागतिक शक्ती बनू शकेल. हा इतिहासाकडून शिकण्याचा आणि नवीन इतिहास घडवण्याचा क्षण आहे. भारताला कोणाच्याही प्रदेशावर कब्जा करायचा नाही; पण वेळप्रसंगी आम्ही भूभागाच्या रक्षणासाठी लक्ष्मणरेषा ओलांडून कारवाई करायलाही तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग