शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

अर्जुनाच्या बाणात ‘आण्विक शक्ती’ होती; बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 03:43 IST

सोशल मीडियातून टीका आणि खिल्ली

कोलकाता : रामायणाच्या काळातही भारतात हवेत उडणारी उपकरणे होती आणि महाभारतातील अर्जुनाच्या बाणामध्ये तर आण्विक शक्ती होती, अशी विधाने करणारे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांच्यावर सोशल मीडियातून टीका सुरू झाली आहे.कोलकात्यातील बिर्ला इंडस्ट्रिअल अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजिकल म्युझियमचे उद्घाटन राज्यपाल धनकड यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसमोर बोलताना राज्यपाल म्हणाले की, भारताला अनेक शतकांपासून विज्ञानाचे ज्ञान होते. विमानांचा शोध नंतर १९१0 च्या सुमारास लागला आहे; पण वेदांचा तुम्ही अभ्यास केला, तर रामायणाच्या काळातही आपल्याकडे हवेत उडणारी उपकरणे (विमाने) होती, असे तुमच्या लक्षात येईल.

महाभारताचा उल्लेख करून राज्यपाल धनकड म्हणाले की, त्या काळात टीव्हीसारखी माध्यमे नव्हती. तरीही युद्धभूमीवर नसलेल्या संजयने संपूर्ण युद्धाची साद्यंत माहिती धृतराष्ट्राला दिली. कारण संजयकडे दिव्यदृष्टी होती. अर्जुनाच्या बाणामध्ये तर आण्विक शक्ती होती, असा दावाही राज्यपालांनी केला. आपण त्या काळात अतिशय शक्तिशाली होतो. त्यामुळे भारताकडे (या ताकदीकडे) दुर्लक्ष करणे जगाला अजिबात परवडणार नाही.

अशी विधाने करणारे जगदीप धनकड हे पहिलेच नाहीत. भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वीही अशी विधाने केली आहेत. गायीच्या दुधात सोने असते, असे वक्तव्य पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी मध्यंतरी केले होते. त्याआधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी महाभारताच्या काळात इंटरनेटची सोय होती आणि त्यामुळे युद्धभूमीवर काय चालले आहे, याची माहिती संजयने धृतराष्ट्राला दिली, असे विधान केले होते.

शिक्षण क्षेत्रातील मंडळींची टीकाराज्यपाल हे संबंधित राज्यांतील विद्यापीठांचे कुलगुरू असतात. त्यामुळे उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने कसलेही पुरावे न देता, अशी विधाने करणे धक्कादायक आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. न्यूक्लीअर फिजिक्सचे प्राध्यापक बिकाश सिन्हा यांनी राज्यपालांची विधाने तथ्यहीन, बेजबाबदार आणि निरर्थक असल्याची टीका केली आहे. प्रा. प्रसंता राय यांनीही राज्यपालांवर टीका केली असून, ते भाजपचा अजेंडा राबवू पाहत आहेत, असे म्हटले आहे. याशिवाय सोशल मीडियातूनही जगदीप धनकड यांच्यावर टीका होत असून, काही जणांनी त्यांची खिल्लीही उडवली आहे.