शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
4
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
5
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
6
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
7
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
8
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
9
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
10
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
11
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
12
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
13
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
14
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
15
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
16
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
17
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
18
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
19
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
20
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!

अर्जुनाच्या बाणात ‘आण्विक शक्ती’ होती; बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 03:43 IST

सोशल मीडियातून टीका आणि खिल्ली

कोलकाता : रामायणाच्या काळातही भारतात हवेत उडणारी उपकरणे होती आणि महाभारतातील अर्जुनाच्या बाणामध्ये तर आण्विक शक्ती होती, अशी विधाने करणारे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांच्यावर सोशल मीडियातून टीका सुरू झाली आहे.कोलकात्यातील बिर्ला इंडस्ट्रिअल अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजिकल म्युझियमचे उद्घाटन राज्यपाल धनकड यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसमोर बोलताना राज्यपाल म्हणाले की, भारताला अनेक शतकांपासून विज्ञानाचे ज्ञान होते. विमानांचा शोध नंतर १९१0 च्या सुमारास लागला आहे; पण वेदांचा तुम्ही अभ्यास केला, तर रामायणाच्या काळातही आपल्याकडे हवेत उडणारी उपकरणे (विमाने) होती, असे तुमच्या लक्षात येईल.

महाभारताचा उल्लेख करून राज्यपाल धनकड म्हणाले की, त्या काळात टीव्हीसारखी माध्यमे नव्हती. तरीही युद्धभूमीवर नसलेल्या संजयने संपूर्ण युद्धाची साद्यंत माहिती धृतराष्ट्राला दिली. कारण संजयकडे दिव्यदृष्टी होती. अर्जुनाच्या बाणामध्ये तर आण्विक शक्ती होती, असा दावाही राज्यपालांनी केला. आपण त्या काळात अतिशय शक्तिशाली होतो. त्यामुळे भारताकडे (या ताकदीकडे) दुर्लक्ष करणे जगाला अजिबात परवडणार नाही.

अशी विधाने करणारे जगदीप धनकड हे पहिलेच नाहीत. भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वीही अशी विधाने केली आहेत. गायीच्या दुधात सोने असते, असे वक्तव्य पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी मध्यंतरी केले होते. त्याआधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी महाभारताच्या काळात इंटरनेटची सोय होती आणि त्यामुळे युद्धभूमीवर काय चालले आहे, याची माहिती संजयने धृतराष्ट्राला दिली, असे विधान केले होते.

शिक्षण क्षेत्रातील मंडळींची टीकाराज्यपाल हे संबंधित राज्यांतील विद्यापीठांचे कुलगुरू असतात. त्यामुळे उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने कसलेही पुरावे न देता, अशी विधाने करणे धक्कादायक आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. न्यूक्लीअर फिजिक्सचे प्राध्यापक बिकाश सिन्हा यांनी राज्यपालांची विधाने तथ्यहीन, बेजबाबदार आणि निरर्थक असल्याची टीका केली आहे. प्रा. प्रसंता राय यांनीही राज्यपालांवर टीका केली असून, ते भाजपचा अजेंडा राबवू पाहत आहेत, असे म्हटले आहे. याशिवाय सोशल मीडियातूनही जगदीप धनकड यांच्यावर टीका होत असून, काही जणांनी त्यांची खिल्लीही उडवली आहे.