शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:46 IST

Rajasthan News: करवा चौथच्या सणासाठी पती घरात उशिरा आल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचं  भांडण होऊन संतापलेल्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवल्याची तर पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसलेल्या पतीनंही मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूर येथे घडली.

करवा चौथच्या सणासाठी पती घरात उशिरा आल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचं  भांडण होऊन संतापलेल्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवल्याची तर पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसलेल्या पतीनंही मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूर येथे घडली. दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी सदर तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता, अशी माहिती समोर येत आहे.

ही घटना राजस्थानमधील हरमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगल सिरस गावात घडली आहे. येथील घनश्याम बुनकर हे घरी उशिरा पोहोचल्याने त्यांची पत्नी मोनिका ही नाराज झाली. त्यानंतर या दोघांमध्येही कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर मोनिका ही रागाने घराबाहेर पडली. तिच्यापाठोपाठ घनश्यामही तिची समजूत काढण्यासाठी गेला. मात्र मोनिका हिने रेल्वे रुळांवर जात भरधाव येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारली आणि जीवन संपवलं.

तुकडे तुकडे झालेला मोनिका हिचा मृतदेह पाहून घनश्यामला मोठा धक्का बसला. त्याने घरी येत काही तासांनंतर मोहिका हिच्या साडीपासून गळफास बनवला आणि जीवन संपवलं. पती आणि पत्नीने उचललेल्या टोकाच्या पावलाची माहिती मिळताच पोलिसांनी घनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि रुग्णालयातील शवागारामध्ये पाठवले. दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी मृत घनश्याम याने भावाला एक मेसेज केला होता. त्यात तो म्हणाला होता की, ‘’भावा, मी हरलो! सॉरी, गणपतजी आणि घनश्याम कंडेल यांच्याशी बोलून घे. ते तुम्हाला मदत करतील. माझ्या आयडीवर आता तुम्हालाच काम करायचं आहे. माझ्या पत्नीनं आज ट्रेनसमोर येऊन जीवन संपवलं’’. दरम्यान, घनश्याम याचा हा मेसेज मोठ्या भावापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने आपलं जीवन संपवलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घनश्याम नेटवर्क मार्केटिंग कंपनीमघ्ये काम करत होता. तसेच करवा चौथच्या दिवशी उशिरा घरी पोहोचला होता. त्यावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यातून दोघांनीही जीवन संपवलं.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिप