शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:46 IST

Rajasthan News: करवा चौथच्या सणासाठी पती घरात उशिरा आल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचं  भांडण होऊन संतापलेल्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवल्याची तर पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसलेल्या पतीनंही मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूर येथे घडली.

करवा चौथच्या सणासाठी पती घरात उशिरा आल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचं  भांडण होऊन संतापलेल्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवल्याची तर पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसलेल्या पतीनंही मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूर येथे घडली. दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी सदर तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता, अशी माहिती समोर येत आहे.

ही घटना राजस्थानमधील हरमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगल सिरस गावात घडली आहे. येथील घनश्याम बुनकर हे घरी उशिरा पोहोचल्याने त्यांची पत्नी मोनिका ही नाराज झाली. त्यानंतर या दोघांमध्येही कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर मोनिका ही रागाने घराबाहेर पडली. तिच्यापाठोपाठ घनश्यामही तिची समजूत काढण्यासाठी गेला. मात्र मोनिका हिने रेल्वे रुळांवर जात भरधाव येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारली आणि जीवन संपवलं.

तुकडे तुकडे झालेला मोनिका हिचा मृतदेह पाहून घनश्यामला मोठा धक्का बसला. त्याने घरी येत काही तासांनंतर मोहिका हिच्या साडीपासून गळफास बनवला आणि जीवन संपवलं. पती आणि पत्नीने उचललेल्या टोकाच्या पावलाची माहिती मिळताच पोलिसांनी घनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि रुग्णालयातील शवागारामध्ये पाठवले. दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी मृत घनश्याम याने भावाला एक मेसेज केला होता. त्यात तो म्हणाला होता की, ‘’भावा, मी हरलो! सॉरी, गणपतजी आणि घनश्याम कंडेल यांच्याशी बोलून घे. ते तुम्हाला मदत करतील. माझ्या आयडीवर आता तुम्हालाच काम करायचं आहे. माझ्या पत्नीनं आज ट्रेनसमोर येऊन जीवन संपवलं’’. दरम्यान, घनश्याम याचा हा मेसेज मोठ्या भावापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने आपलं जीवन संपवलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घनश्याम नेटवर्क मार्केटिंग कंपनीमघ्ये काम करत होता. तसेच करवा चौथच्या दिवशी उशिरा घरी पोहोचला होता. त्यावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यातून दोघांनीही जीवन संपवलं.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिप