शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास पोरी! अडचणी आल्या पण हार नाही मानली; शेती करुन करते लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 16:28 IST

एक एकर जमिनीवर पॉली हाऊस सुरू केलं आणि आज अनुष्का 6 एकर जमिनीवर भाजीपाल्याची लागवड करत आहे, ज्यामुळे तिला भरपूर नफा मिळतो. 

शेती करून लाखो रुपये कमावणाऱ्या तरुणीची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. kisantak.in च्या रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे राहणारी अनुष्का जयस्वाल हिने दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलं आहे, मात्र इतरांप्रमाणे नोकरी करण्याऐवजी तिने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज तिला वर्षाला 45 लाख रुपये मिळतात. अनुष्काने जेव्हा शेती करायला सुरुवात केली तेव्हा ती 23 वर्षांची होती आणि आता वयाच्या 27 व्या वर्षी ती दरमहा लाखो रुपये कमावते.

एका मुलाखतीत अनुष्काने सांगितलं की, 2021 मध्ये तिने लखनौच्या मोहनलालगंज भागातील सिसेंडी गावात एक एकर जमीन घेऊन शेती सुरू केली होती. तिने सांगितलें की तिला सरकारकडून शेतीसाठी 50 टक्के सब्सिडी मिळाली होती, त्यानंतर तिने एक एकर जमिनीवर पॉली हाऊस सुरू केलं आणि आज अनुष्का 6 एकर जमिनीवर भाजीपाल्याची लागवड करत आहे, ज्यामुळे तिला भरपूर नफा मिळतो. 

अनुष्काने पुढे सांगितलं की, जेव्हा तिने काम करण्याऐवजी शेती करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते, परंतु सर्व अडचणी असूनही तिने कधीही हार मानली नाही आणि आज ती लाखो रुपये कमवत आहे.

सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या भाज्या

अनुष्का जयस्वालने सांगितलं की, तिच्या शेतातून पिकवलेल्या भाज्या लखनौच्या सर्व मार्केट आणि शॉपिंग मॉल्समध्ये विकल्या जातात, ज्यामुळे तिला चांगला नफा मिळत आहे. आपल्या कुटुंबाबद्दल ती म्हणाली की तिचे वडील व्यापारी आहेत आणि आई गृहिणी आहे. भाऊ पायलट आहे, बहीण वकील आहे आणि वहिनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.

शेतीचा अनुभव नव्हता, म्हणून शेतीचे प्रशिक्षण घेतले. मजुरांना तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे प्रशिक्षण दिले. एक एकर जागेवर बांधलेल्या पॉली हाऊसमध्ये 50 टन काकडी आणि 35 टन पिवळ्या शिमला मिरचीचे उत्पादन घेतले आहे. लखनौच्या भाजी मार्केट आणि मॉल्समध्ये तिच्या शेतातून पिकवलेल्या भाज्यांना खूप मागणी आहे.

अनुष्का तिच्या शेतात कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरत नाही. ती सांगते की ती सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवते, जी पूर्णपणे रसायनमुक्त आहे. फलोत्पादन विभागाकडून ड्रॉप मोअर क्रॉप अंतर्गत 90 टक्के अनुदान मिळाले असून त्यामुळे भाजीपाला लागवडीवर खर्च कमी आणि उत्पादन जास्त असल्याचं तिने सांगितलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :farmingशेतीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी