शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कलम ३७० रद्दची वर्षपूर्ती! विकासाच्या दृष्टीने पावले खुंटलेलीच...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 10:58 AM

काश्मिरमध्ये आजही अनेक सेवा बंद..

ठळक मुद्दे  भविष्यात बदल होण्याची तरूणांना अपेक्षा  

निनाद देशमुखपुणे : दहशतवाद, सातत्याने लादल्या जाणाऱ्या कर्फ्यूमुळे काश्मिरी नागरिक आधिच त्रस्त होता. त्यात ३७० कलम रद्द करत काश्मिर केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आला. या निर्णयाने वेगाने विकास होईल अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, वर्षाच्या सुरूवातीला कर्फ्यू आणि त्यानंतर कोरोनामुळे लागलेले लॉकडाऊन यामुळे काहीच झाले नाही. बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे.  येत्या काळात आम्हाला आमचे हक्क मिळतील अशी अपेक्षा काश्मिरी तरूणांनी व्यक्त केली.

५ आॅगस्ट २०१९ ला केंद्रसरकारने एतिहासिक निर्णय घेत जम्मुकाश्मिरचे विभाजन करत दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. या निर्णयास अनेक स्थानिकांनी विरोध केला तर काहींनी स्वागत केले. हा निर्णय घेतांना येथील  रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, उद्योगधंदे येतील, दहशतवाद संपले, तसेच फुटीरतावादी वृत्तींना आळा बसेल असे सांगण्यात आले. हा निर्णय घेतांना सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने कर्फ्यू लावला. महाविद्यालये शाळा बंद करण्यात आली. या सोबतच इंटरनेट सुविधाही बंद करण्यात आली. दरम्यान टप्याटप्याने हे बंधने उठवण्यात आली. मात्र, काही निर्बंध येथे आजही आहेत. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षात ना रोजगार आलेत ना निर्बंध हटले.  

कुपवाडा जिल्ह्यातील जहिद अजिज शेख याने बीकॉम शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो कंत्राटदार आहे. मात्र, गेल्या वर्षभरात येथील नव्या निर्बंधामुळे त्याला कुठलेही नवे कंत्राट मिळालेले नाही. शिवाय अनेक शासकीय कंत्राटांचे आधीचे बीलही थकले असल्याचे त्याने लोकमतशी बोलतांना सांगितले. शाळा महाविद्यालये बंद असल्याने अनेक तरूण बेरोजगार आहेत. यामुळे दहशतवाद्यांकडे तरूण आकर्षित होत आहेत. राज्याच्या दर्जा असतांही या समस्या आमच्या पुढे कायम होत्या. त्या आजही आहेत. राज्याचा दर्जा पूर्वी असल्याने आम्ही आमच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे मांडू शकत होतो. मात्र, आता हा अधिकारही आमच्याकडे राहिलेला नाही.

नाशिक येथे होमीओपॅथीचे शिक्षण घेत असलेली आणि मुळची  अनंतनाग जिल्ह्यातील असलेली नादीया शेख म्हणाली, केंद्रशासीत प्रदेश बनल्याने विकास होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, सुरवातीला असलेल्या बंदमुळे आणि कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मर्याचा प्रशासनाला आल्या असतील. येत्या काळात नक्कीच यात बदल होईल अशी आशा आहे.

बीएससी आणि सिव्हील इंजिनिअर असलेला कुपवाडा येथील शौकत अहमद मीर म्हणाला, काश्मिरमध्ये वर्षभरात दोन मतप्रवाह पाहयला मिळाले. एक बाजुने आणि एक विरोधी. नागरिकांना रोजगार असेल तर त्यांना असल्या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे प्राधान्यांने रोजगार निर्मिती करायला हवी. सध्या कोरोनामुळे सर्व बंद आहेत. नागरिकांना धान्याचा पुरवठा झाला. पण कामे नसल्याने विरोधाचा सुर वाढतो आहे.

दहशतवाद्यांच्या घटनेत वाढवर्ष भरात अनेक दहशतवाद्यांना कठस्नान घालण्यात आले. लष्कर आणि पोलीसांतर्फे या कारवाया करण्यात आल्या. सुरक्षा रक्षकांना यात यश आले असले तरी दहशतवाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे......लॉकडाऊमध्ये जे देश भोगतोय ते आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोयकोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन लावण्यात आला आहे. यामुळे नागरिक घरात बंदिस्त झाले आहेत. आता या लॉकडाऊनला विरोध होत आहे. मात्र, कुठल्याही प्रकारची महामारी नसतांना आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून असे लॉकडाऊन भोगत आलेलो आहे. त्यामुळे संपुर्ण देशाला आमच्यावर काय अत्याचार होत आहे याची प्रचिती आली असेल.- जहिद अजिज शेख, कुपवाडा

 ----पर्यटनही बंददेशाचे नंदवन असलेल्या जम्मु काश्मिरमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून बंद आहे. यामुळे या ठिकाणी बेरोजगारी वाढली आहे.---

विकासासाठी वाट पाहावी लागेलपाकिस्तानला थेट युद्धात भारताला हरवीने कठीण असल्याने त्यांनी दहशवादाचा स्विकार केला. १९९४पासून येथे दहशतवाद वाढतोय. स्थानिक राजकीय पुढा-यांनीही स्व:ताच्या फायदा बघत येथे विकास होऊ दिला नाही. परिणामी येथील दरी ही दिवसेंदिवस वाढत गेली. लष्कराने दहशतवादाविरोधात मोठी आघाडी या परिसरात घेतली असली तरी दहशतवाद कमी झालेला नाही. येथील तरूणांना या प्रवृत्तींपासूण परावृत्त करणे गरजेचे आहे. केंद्रशासित प्रदेशामुळे विकासाला वाव आहे. एका वर्षात याचे परिणामदिसतील असे म्हणने योग्य होणार नाही. विकासाठी आपल्याला आणखी काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे.-निवृत्त लेफ्टनंट जनरल अता हसनेन

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Central Governmentकेंद्र सरकारtourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्याTerrorismदहशतवाद