शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आंध्र प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:29 IST

आंध्र प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे आंध्र प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

हैदराबाद - आंध्र प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मरेदुमिल्ली आणि चिंतूरूदरम्यान हा भीषण अपघात झाला. 

आंध्र प्रदेशमधील मरेदुमिल्लीपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगड सीमेवर असणाऱ्या राजमुंदरी या आदिवासी भागातून काही पर्यटक चिंतूरूकडे जात होते. त्याच दरम्यान दुपारी दोन वाजता घाटम रोडवरील वाल्मिकी कोंडा येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली आहे. घटनेची माहिती पोलीस आणि घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (15 ऑक्टोबर) आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात एक बस दरीत कोसळली आहे. या बसमध्ये जवळपास 20 ते 25 प्रवासी होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे  मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तराखंडमध्येही सोमवारी रात्री कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील यमनोत्री नॅशनल हायवेवर हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू झाले. मात्र अंधार असल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते. याआधी देखील रविवारी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात एक जीप दरीत कोसळली होती. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. तर 5 जण जखमी झाले होते.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस