शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

मुख्यमंत्री भावाविरोधात मोर्चा, वायएस शर्मिला रेड्डी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 16:17 IST

APCC chief YS Sharmila Reddy : बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे.

APCC chief YS Sharmila Reddy detained by police in Vijayawada (Marathi News) आंध्र प्रदेशात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशकाँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी आपला भाऊ वायएसआरसीपी नेते आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. याआधी वायएस शर्मिला रेड्डी यांनी सरकारवर आरोप केला होता की, त्यांना नजरकैदेत ठेवले जाऊ शकते. नजरकैदेच्या भीतीने शर्मिला रेड्डी यांनी संपूर्ण रात्र काँग्रेस कार्यालयात काढली. दरम्यान, आता वायएस शर्मिला रेड्डी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी गुरुवारी चलो सचिवालय नारा दिला आहे. यादरम्यान, वायएस शर्मिला रेड्डी आपल्या कार्यकर्त्यांसह सचिवालयाच्या दिशेने जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी आम्ही बेरोजगार युवकांच्या बाजूने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुम्ही आम्हाला नजरकैदेत ठेवणार का? असा सवाल वायएस शर्मिला रेड्डी यांनी सरकारला केला होता. 

याचबरोबर, आम्हाला लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार नाही का? एक महिला असून घरात नजरकैदेतून सुटका व्हावी, यासाठी मला पोलिसांपासून वाचण्यासाठी संपूर्ण रात्र पक्षाच्या कार्यालयात घालवावी, लागते हे लाजिरवाणे नाही का? आम्ही दहशतवादी आहोत का? आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगत वायएस शर्मिला रेड्डी यांनी मुख्यमंत्री भावावर हल्लाबोल केला होता.

वायएस शर्मिला रेड्डी यांनी विजयवाडा येथील आंध्ररत्न भवन (काँग्रेस कार्यालय) येथे पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, जगन मोहन रेड्डी गेल्या पाच वर्षांत तरुण, बेरोजगार आणि विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. याचबरोबर, राज्य सरकार आम्हाला घाबरतंय. ते स्वत:चे अपयश आणि राज्यातील वास्तव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. भले ही ते आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत असतील, आमच्या कार्यकर्त्यांना थांबवाल, बॅरिकेड्स लावून त्यांना अडवाल परंतु बेरोजगारीच्या समस्येबाबत आमचा संघर्ष थांबणार नाही, असा इशाराही शर्मिला रेड्डी यांनी दिला होता.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशcongressकाँग्रेस