शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुख्यमंत्री भावाविरोधात मोर्चा, वायएस शर्मिला रेड्डी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 16:17 IST

APCC chief YS Sharmila Reddy : बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे.

APCC chief YS Sharmila Reddy detained by police in Vijayawada (Marathi News) आंध्र प्रदेशात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशकाँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी आपला भाऊ वायएसआरसीपी नेते आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. याआधी वायएस शर्मिला रेड्डी यांनी सरकारवर आरोप केला होता की, त्यांना नजरकैदेत ठेवले जाऊ शकते. नजरकैदेच्या भीतीने शर्मिला रेड्डी यांनी संपूर्ण रात्र काँग्रेस कार्यालयात काढली. दरम्यान, आता वायएस शर्मिला रेड्डी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी गुरुवारी चलो सचिवालय नारा दिला आहे. यादरम्यान, वायएस शर्मिला रेड्डी आपल्या कार्यकर्त्यांसह सचिवालयाच्या दिशेने जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी आम्ही बेरोजगार युवकांच्या बाजूने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुम्ही आम्हाला नजरकैदेत ठेवणार का? असा सवाल वायएस शर्मिला रेड्डी यांनी सरकारला केला होता. 

याचबरोबर, आम्हाला लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार नाही का? एक महिला असून घरात नजरकैदेतून सुटका व्हावी, यासाठी मला पोलिसांपासून वाचण्यासाठी संपूर्ण रात्र पक्षाच्या कार्यालयात घालवावी, लागते हे लाजिरवाणे नाही का? आम्ही दहशतवादी आहोत का? आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगत वायएस शर्मिला रेड्डी यांनी मुख्यमंत्री भावावर हल्लाबोल केला होता.

वायएस शर्मिला रेड्डी यांनी विजयवाडा येथील आंध्ररत्न भवन (काँग्रेस कार्यालय) येथे पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, जगन मोहन रेड्डी गेल्या पाच वर्षांत तरुण, बेरोजगार आणि विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. याचबरोबर, राज्य सरकार आम्हाला घाबरतंय. ते स्वत:चे अपयश आणि राज्यातील वास्तव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. भले ही ते आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत असतील, आमच्या कार्यकर्त्यांना थांबवाल, बॅरिकेड्स लावून त्यांना अडवाल परंतु बेरोजगारीच्या समस्येबाबत आमचा संघर्ष थांबणार नाही, असा इशाराही शर्मिला रेड्डी यांनी दिला होता.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशcongressकाँग्रेस