शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री भावाविरोधात मोर्चा, वायएस शर्मिला रेड्डी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 16:17 IST

APCC chief YS Sharmila Reddy : बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे.

APCC chief YS Sharmila Reddy detained by police in Vijayawada (Marathi News) आंध्र प्रदेशात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशकाँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी आपला भाऊ वायएसआरसीपी नेते आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. याआधी वायएस शर्मिला रेड्डी यांनी सरकारवर आरोप केला होता की, त्यांना नजरकैदेत ठेवले जाऊ शकते. नजरकैदेच्या भीतीने शर्मिला रेड्डी यांनी संपूर्ण रात्र काँग्रेस कार्यालयात काढली. दरम्यान, आता वायएस शर्मिला रेड्डी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी गुरुवारी चलो सचिवालय नारा दिला आहे. यादरम्यान, वायएस शर्मिला रेड्डी आपल्या कार्यकर्त्यांसह सचिवालयाच्या दिशेने जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी आम्ही बेरोजगार युवकांच्या बाजूने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुम्ही आम्हाला नजरकैदेत ठेवणार का? असा सवाल वायएस शर्मिला रेड्डी यांनी सरकारला केला होता. 

याचबरोबर, आम्हाला लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार नाही का? एक महिला असून घरात नजरकैदेतून सुटका व्हावी, यासाठी मला पोलिसांपासून वाचण्यासाठी संपूर्ण रात्र पक्षाच्या कार्यालयात घालवावी, लागते हे लाजिरवाणे नाही का? आम्ही दहशतवादी आहोत का? आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगत वायएस शर्मिला रेड्डी यांनी मुख्यमंत्री भावावर हल्लाबोल केला होता.

वायएस शर्मिला रेड्डी यांनी विजयवाडा येथील आंध्ररत्न भवन (काँग्रेस कार्यालय) येथे पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, जगन मोहन रेड्डी गेल्या पाच वर्षांत तरुण, बेरोजगार आणि विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. याचबरोबर, राज्य सरकार आम्हाला घाबरतंय. ते स्वत:चे अपयश आणि राज्यातील वास्तव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. भले ही ते आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत असतील, आमच्या कार्यकर्त्यांना थांबवाल, बॅरिकेड्स लावून त्यांना अडवाल परंतु बेरोजगारीच्या समस्येबाबत आमचा संघर्ष थांबणार नाही, असा इशाराही शर्मिला रेड्डी यांनी दिला होता.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशcongressकाँग्रेस