शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

स्थलांतरित मजुरांसाठी आंध्र सरकारच पॅकेज, जगनमोहन यांचं विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 5:42 AM

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे

हैदराबाद : अन्य राज्यांतून आलेल्या स्थलांतरित मजुरांनी धोका पत्करून घरी परत जाण्याचा आटापिटा न करता ‘लॉकडाऊन’ संपेपर्यंत त्यांना सध्या ज्या शिबिरांमध्ये ठेवले आहे तेथेच राहण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे यासाठी आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्याशी एक आकर्षक ‘पॅकेज’ देऊ केले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे. हे पैसे त्यांना सुरक्षित वाहनाने घरी परत जायला व तेथे गेल्यानंतर पुढे काही दिवस जेवणाखाण्यासाठी उपयोगी पडतील, असा सरकारचा विचार आहे. आता या स्थलांतरितांना डाळ किंवा सांबार भाताखेरीज दूध, अंडे, फळे, सुकामेवा, संत्रावर्गीय फळ व केळेही देण्यात येत आहे. असा प्रत्येक स्थलांतरित मजुरावर राज्य सरकार जेवण, निवास व्यवस्था, प्रवास व स्वच्छतागृहे यासाठी दिवसाला प्रत्येकी ८५० रुपये खर्च करीत आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था)उद्धव ठाकरे यांना ममता बॅनर्जींचा फोनच्कोलकाता : महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आदी राज्यांत लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या बंगाली मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना स्थानिक यंत्रणा व लोकांशी समन्वय साधून पश्चिम बंगाल सरकारतर्फे आर्थिक मदत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी जाहीर केले.च्महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांच्या देखभालीसाठी योग्य प्रकारे काम करत असल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून त्यांचे आभार मानले.च्मुंबईत अडकून पडलेले हजारो स्थलांतरित मजूर वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या बाहेर बुधवारी जमा झाले. आम्हाला गावी परतायचे असून त्यासाठी विशेष ट्रेन चालवाव्यात अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीचे राजकीय भांडवल करण्याचा काही जणांकडून प्रयत्न होत असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली. महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांसाठी करत असलेल्या कार्यात पश्चिम बंगाल सरकार सहकार्य करण्यास तयार आहे असे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून सांगितले.च् मुंबईप्रमाणेच गुजरातमधील सूरत येथेही अडकून पडलेले स्थलांतरित मजूर आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. या आठवड्यात दुसऱ्यांदा असा प्रकार तिथे घडला आहे.प. बंगालमध्ये अडकले दोन लाख मजूरच्देशातील १८ राज्यांमध्ये हजारो बंगाली मजूर अडकून पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अन्य राज्यातून आलेले २ लाख स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्या सर्वांच्या राहाण्याची व जेवणाची सोय राज्य सरकारने ७११ निवारा छावण्यांत केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणhyderabad-pcहैदराबादAndhra Pradeshआंध्र प्रदेश