शहरं
Join us  
Trending Stories
1
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
2
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
3
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
4
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
5
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
6
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
7
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
8
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
9
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
10
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
11
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
12
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
13
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
14
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
15
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
16
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
17
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
18
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
19
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
20
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबला तीन महिन्यांत व्यसनमुक्त करणार, भगवंत मान सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल, अधिकाऱ्यांना दिले असे आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 23:30 IST

Punjab News: मागच्या काही वर्षांपासून वाढती व्यसनाधीनता ही पंजाबमधील गंभीर समस्या बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाबला व्यसनमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

मागच्या काही वर्षांपासून वाढती व्यसनाधीनता ही पंजाबमधील गंभीर समस्या बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाबला व्यसनमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज व्यसनाधीनतेविरोधात लढ्याची घोषणा करताना पोलीस आयुक्त, उपायुक्त, एसएसपी यांना तीन महिन्यांच्या आत पंजाबला व्यसनमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. 

आज याबाबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण राज्य सरकराने व्यसनाधीनतेबाबत नो टॉलरंस धोरण अबलंबण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या समस्येविरोधात व्यापक लढाई सुरू करण्याची तयारी केली आहे.  

भगवंत मान पुढे म्हणाले की, पंजाब पोलिसांचा कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी विविध आव्हानांचा सामना करण्याचा उत्तम इतिहास आहे. पोलीस ही परंपरा कायम राखेल आमि सर्वसामान्यांच्या सक्रीय सहभागाने संपूर्ण राज्याला पूर्णपणे व्यसनमुक्त बनवेल. मुख्यमंत्र्यांनी  सांगितले की, सरकार व्यसनाधीनतेच्या प्रकरणात जलद सुनाणी आणि दोषींनी शिक्षा करण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्टांची स्थापना करणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, या कामासाठी पोलीस आणि प्रशासनला पूर्ण सहकार्य केलं जाईल.  यावेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात सापडू नये म्हणून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यसनांना आळा घालण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचाही निश्चय केला आहे. त्यांनी व्यसनांचा पुरवठा करणारी साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी आणि अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणारे आणि त्यांच्या कुटुंबीयांना वीज, पाणी आणि इतर सुविधांमध्ये कुठलीही सवलत मिळता कामा नये, यासाठी राज्य सरकार व्यवस्था करणार असल्याचेही भगवंत मान यांनी सांगितले. याबरोबरच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विरोधात कारवाईचं उदाहरण घालून देण्यासाठी एनडीपीएस कायद्यामध्ये कुठल्याही आणखी दुरुस्तीची आवश्यकता भासली तर हा मुद्दा केंद्र सरकारसमोर उपस्थित केला जाईल, असेही भगवंत मान यांनी सांगितले.  

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मान