शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Amit Shah : मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता! अमित शाह यांचा काँग्रेसवर मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 00:17 IST

"मोदीजींच्या विरोधात एसआयटी स्थापन केली गेली. भ्रष्टाचाराचे कोणतेही प्रकरण नव्हते. दंगलीत भूमिका असल्याचे खोटे प्रकरण बनवले गेले, जे शेवटी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. आम्ही काहीही आदळ-आपट केली नाही. आम्ही कधीही काळे कपडे घालून संसद ठप्प केली नाही."

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी काँग्रेसवर मोठा आरोप केला. काँग्रेसची त्यांच्या शासन काळात सीबीआयच्या मदतीने नरेंद्र मोदीं यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याची इच्छा होती. एवढेच नाही, तर नरेंद्र मोदींना बनावट चकमक प्रकरणात अडकविण्यासाठी सीबीआयने आपल्यावर दबाव टाकला होता, असे शाह यांनी म्हटले आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आपण स्वतः राज्याचे गृहमंत्री होतो, असेही अमित शहा यांनी सांगितले. 

अमित शहा म्हणाले. "मी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा बळी आहे. काँग्रेसने आमच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला नव्हता का? एक एन्काउंटर झाले. तेव्हा मी गुजरात राज्याचा गृहमंत्री होतो. सीबीआयने मला अटक केली. जर काँग्रेस सरकारने ते मिटवले नसेल, तर आजही सीबीआयच्या रेकॉर्डमध्ये असेल. 90% प्रश्नांमध्ये हेच होते की, 'तुम्ही कशाला त्रास घेताय, मोदींचे नाव घ्या, तुम्हाला सोडून देऊ.' शाह नेटवर्क18 समूहाच्या ‘रायजिंग इंडिया सम्मेलन 2023’ मध्ये बोलत होते. 

यावेळी काँग्रेसला आरसा दाखवताना अमित शहा म्हणाले, "त्यावेळी आम्ही तर काळे कपडे घातले नाहीत. आम्ही आंदोलनही केले नाही. एका राज्याचे मुख्यमंत्री असताना मोदीजींच्या विरोधात एसआयटी स्थापन केली गेली. भ्रष्टाचाराचे कोणतेही प्रकरण नव्हते. दंगलीत भूमिका असल्याचे खोटे प्रकरण बनवले गेले, जे शेवटी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. आम्ही काहीही आदळ-आपट केली नाही. आम्ही कधीही काळे कपडे घालून संसद ठप्प केली नाही." एवढेच नाही, तर "मला अटक करण्यात आली. उच्च न्यायालयाने मला 90 दिवसांत जामीन मंजूर केला. त्यावेळी, मला अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे," ही आठवणही यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी करून दिली. 

शाह पुढे म्हणाले, "काँग्रेसने आपल्याविरुद्ध गुजरातबाहेर मुंबईत खटला चालवला. पण तरीही आमची काहीच हरकत नव्हती. तेथील न्यायालय म्हणाले, "राजकीय सूडबुद्धी आणि राजकीय इशाऱ्यावर सीबीआयने ही केस केली आहे. त्यामुळे आम्ही अमित शहा यांच्यावरील खटला आणि सर्व आरोप फेटाळून लावतो. आम्ही आदळ-आपट केली नाही. तेव्हाही, पी. चिदंबरम, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच लोक होते. पण आम्ही त्यांच्यावर कोणताही खोटा गुन्हा दाखल केलेला नाही." 

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या आरोपांवर शाह म्हणाले, “आम्ही 2014 च्या निवडणुकीत आश्वासन दिले होते की, आमची लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. आणीबाणीच्या काळात लाखो निष्पाप नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते," हा आठवणही शाह यांनी यावेळी करून दिली.

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीCBIगुन्हा अन्वेषण विभाग